वर्ध्याजवळ द्राक्षाच्या ट्रकचा अपघात, एकाचा मृत्यू; संधीसाधू लोकांनी मारला द्राक्षांवर डल्ला
अनेकदा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणं हा मानवधर्म म्हणून ओळखला जातो. परंतू अनेकदा काही लोकं संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करायची सोडून स्वतःचा स्वार्थ साधताना पहायला मिळतात. वर्ध्यात घडलेल्या एका रस्ते अपघातात असचं चित्र पहायला मिळालं. वर्ध्यावरुन नागपूरकडे जाणाऱ्या एका द्राक्षाच्या ट्रकचा अपघात झाला, ज्यात चालकाला आपले प्राण गमवावे लागले आणि एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला. […]
ADVERTISEMENT

अनेकदा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करणं हा मानवधर्म म्हणून ओळखला जातो. परंतू अनेकदा काही लोकं संकटात सापडलेल्या व्यक्तींना मदत करायची सोडून स्वतःचा स्वार्थ साधताना पहायला मिळतात. वर्ध्यात घडलेल्या एका रस्ते अपघातात असचं चित्र पहायला मिळालं. वर्ध्यावरुन नागपूरकडे जाणाऱ्या एका द्राक्षाच्या ट्रकचा अपघात झाला, ज्यात चालकाला आपले प्राण गमवावे लागले आणि एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला.
परंतू यावेळी लोकांनी रस्त्यावर सांडलेली द्राक्ष पळवून नेण्यात धन्यता मानली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
रविवारी मध्यरात्री वर्ध्याच्या केळापूर शिवारात हा अपघात घडला. रवी भास्कर जाधव (वय २६, बुलढाणा) असं या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. रवी हा ट्रक वर्ध्यावरुन नागपूरच्या बाजारात घेऊन चालला होता. मध्यरात्री घडलेल्या अपघातानंतर या ट्रकमधील द्राक्षांचा सडा दिवसभर रस्त्यावर पडून होता. सकाळी या रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी मग संधीचा फायदा घेत ही द्राक्ष पळवली.











