मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा वेगवेगळे पदार्थ खाल्ल्यानंतर ती प्रचंड वाढत असते.
मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवणाऱ्या काही पदार्थांचे सेवन न करणे हेच त्यांच्या फायद्याचे असते.
तुम्ही तुमचे जेवण तुम्ही कसे खाता त्यावर देखील तुमच्या रक्तातील साखरचे प्रमाण ठरत असते.त्यामुळे तुमच्या आहारामध्ये काही एक पथ्ये ठेवला तर रक्तातील साखर झपाट्याने कमी होते असते.
तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही नियम ठेवल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सहज नियंत्रित राहू शकते.
तुम्ही घरी असाल तर आधी भाज्या, मग चिकन, मासे किंवा अंडी, मग भात आणि शेवटी काहीतरी गोड खाण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही हॉटेलमध्ये असाल तर जेवणापूर्वी कॉम्प्लिमेंटरी ब्रेड खाऊ नका. हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
गोड चहा किंवा ज्यूस यासारख्या साखरयुक्त पेयांचे सेवन केल्यानेही रक्तातील साखरेच्या पातळीवर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेवणासोबत काहीतरी गोड प्यायचे असेल तर ते जेवणानंतर प्या.
Fitness: चाळीशीनंतरही दिसायचं हॉट?, ‘या’ आहेत 9 टिप्स