तुम्हाला माहिती आहे का, पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो?
माणसासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. शरीराचे सर्व काम व्यवस्थित करण्यासाठीच शरीराला पाण्याची प्रचंड मोठी गरज असते.
घाम आणि लघवीद्वारे शरीरातून पाणी सतत बाहेर पडत असते. त्यामुळे शरीराला पाण्याची पुन्हा पुन्हा गरज असते.
तुमच्या शरीराचे काम योग्यरित्या करण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नसेल तर त्याला निर्जलीकरण असं म्हणतात. मानवी शरीरात 60 टक्के पाणी आणि मुलांमध्ये हेच प्रमाण 75 टक्क्यांएवढे असू शकते.
ठराविक प्रमाणात पाणी मिळाल्याशिवाय कोणीही जास्त काळ जगू शकणार नाही. पाण्याशिवाय जगण्याची वेळ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.
हवामान, वय, वजन, लिंग, पाणीयुक्त पदार्थांचे सेवन यांच्या आधारेच मानवी शरीरातील पाण्याची गरज ठरवत असते.
हवामान उष्ण असेल तर शरीराला जास्त घाम येतो ज्यामुळे जास्त पाण्याची गरज असते. जर तुम्हाला ताप आला असेल आणि उलट्या होत असतील तर तुमच्या शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. जर तुम्ही व्यायाम करत असाल तरीही घामामुळे शरीरात पाणी कमी पडत असते.
पण तुम्हाला माहिती आहे का की पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो?
जे लोक वयोमानानुसार आजारी असतात ती माणसं अन्न आणि पाण्याशिवाय फक्त काही दिवस किंवा काही आठवडेच जगू शकतात.
जे लोक उपोषण करतात पण पाणी पिऊन राहतात ते पाण्यामुळे काही महिने किंवा त्याहून अधिक काळ ते जगू शकतात.
एका संशोधनानुसार असा निष्कर्ष काढला गेला आहे की, अन्न आणि पाण्याशिवाय 8 ते 21 दिवसांपेक्षा जास्त काळ माणूस जगू शकत नाही.
महिलांना दररोज 2.6 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात तर पुरुषांनी 3.6 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
जर कोणी पुरेसे पाणी पीत नसेल तर शरीराला त्याचा फटका बसतो. पाण्याशिवाय शरीरातील पेशी संकुचित होत असतात. मेंदूकडून शरीराला लघवी कमी करण्याचे संकेतही मिळू शकतात. त्याचा परिणाम किडनीवर होतो.
रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडांना पुरेसे कार्य करणे गरजेचे आहे. पुरेशा पाण्याशिवाय किडनीचे काम थांबले जाऊ शकते. त्याचा परिणाम अनेक अवयवांवर होतो.
पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान बिघडते, इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतील, सांधे दुखू लागतील, मेंदूला सूज येईल, रक्तदाब कमी किंवा जास्तही होऊ शकतो.
याशिवाय ऊर्जेचा अभाव, थकवा, क्रॅम्प्स, मेंदूला सूज येणे, किडनी निकामी होणे असे त्रास संभवू शकतात.
तू तर नखरेल नार.. श्वेताचे फोटो अन् तुमच्याही काळजाचं होईल पाणी!