कथाकार आणि प्रेरक वक्त्या जया किशोरी तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. करिअर, प्रेम, नातेसंबंध आणि लग्न अशा अनेक मुद्द्यांवर त्या मत मांडतात.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत जया किशोरी यांना विचारण्यात आले की, तरुणांचे एका ठिकाणी लक्ष केंद्रित होत नाही या मुद्द्यावर त्यांचं काय मत आहे? यावर त्या म्हणाल्या, 'यासाठी ध्यान आणि इतर अनेक गोष्टी आहेत.'
Photo Credit; instagram
त्या पुढे म्हणाल्या, 'पण तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांसोबत बसा. तिथून तुम्हाला भरपूर ज्ञान मिळते. ते ज्या गोष्टी सांगतात त्या ऐका. त्यात एक गोष्ट असेल जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल.'
Photo Credit; instagram
'त्यांच्या दहा गोष्टींपैकी एक गोष्ट अशी असेल. यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. त्याचं शांतपणे ऐका.'
Photo Credit; instagram
जेव्हा जया किशोरींना विचारण्यात आलं की, तरुणांमधील हार्टब्रेकच्या समस्येबद्दल काय सांगाल तेव्हा त्या म्हणाल्या, ' मला विश्वास आहे की प्रत्येक नातं एक ना एक दिवस विश्वासघात करेल. चला हे मान्य करूया. जितक्या जास्त अपेक्षा तितके जास्त दु:ख.'
Photo Credit; instagram
'कोणत्याही गोष्टीसाठी, हेच सर्वस्व आहे, हेच जीवन आहे, असे मानणे चुकीचे आहे, स्वत:वर आशा ठेवा, देवावर आशा ठेवा. तुमच्या आनंदासाठी तुम्हीच जबाबदार आहात. स्वतःची काळजी घ्या.'
Photo Credit; instagram
फसवणूक कशी टाळायची, ' विश्वास ठेवा पण डोळे उघडे ठेवा. देवाशिवाय कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. प्रेमाच्या पट्टीत सर्व काही चुकीचे चांगलेच वाटते.'
Photo Credit; instagram
'भ्रम आणि कल्पनेत राहू नका. आपल्याला पाहिजे तसे होईल असे समजू नका.'