शिंदेंचं सरकार राहणार की जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल देवेंद्र फडणवीसांची मोठी विधानं
राजकीय घडामोडी पाहता त्यांनी या सगळ्याबाबत मुंबई Tak च्या विशेष कार्यक्रमात अनेक महत्त्वाची वक्तव्य केली आहेत.
"ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी बघितली, त्यांच्या हे लक्षात आलं असेल, की उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं सरकार परत येऊ शकत नाही."
"मी वकील आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांनी दिलेल्या राजीनामा रद्द करून त्यांना परत कसं आणून बसवणार नाही."
“सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल अंदाज लावणे चुकीचं आहे. आमच्या भूमिकेमुळे आम्हाला असं वाटतं."
“सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल अंदाज लावणे चुकीचं आहे. आमच्या भूमिकेमुळे आम्हाला असं वाटतं."
"मी आज माझं भाकित सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोरं जाऊ."
"हे सरकार स्थिर आहे. या सरकारमध्ये कुठलाही बदल होणार नाही. आणि शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील.”
'यामुळे त्यांची पातळी खाली दिसते. आता त्यांनी वापरले तर साहजिकच त्याचं समर्थन तर कोणी करूच शकत नव्हतं.'
"मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात बदल होतात. ते नवीन नाही."
“आपण महाराष्ट्रात बघितलं तर राजकारण स्थिर आहे."
चेन्नईला मोठा धक्का, स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर