Photo Credit; instagram

Arrow

किती दिवस पाणी न प्यायल्यास होऊ शकतो मृत्यू?

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक सजीवासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. शरीराला व्यवस्थित काम करण्यासाठी ठराविक प्रमाणात पाण्याची गरज असते.

Photo Credit; instagram

Arrow

याचं कारण म्हणजे घाम आणि लघवीद्वारे पाणी शरीरातून सतत बाहेर पडते. यासाठी पाणी पिणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसं पाणी मिळत नसेल तर याला डिहायड्रेशन म्हणतात. मानवी शरीरात ६०% पाणी आहे. तर मुलांमध्ये याचं प्रमाण ७५% आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ठराविक प्रमाणात पाणी न प्यायल्यास कोणीही जास्त काळ जगू शकणार नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

हवामान, हालचाली, वय, वजन, लिंग, जंक फूडचं सेवन इत्यादींवरून मानवी शरीरातील पाण्याची किती गरज आहे हे ठरते.  

Photo Credit; instagram

Arrow

उदाहरणार्थ, उन्हाळ्याच्या हंगामात शरीरातून जास्त घाम बाहेर पडतो, ज्यामुळे जास्त तहान लागते. ताप, उलट्या होत असल्यास शरीरातील पाणी कमी होतं. 

Photo Credit; instagram

Arrow

पण पाण्याशिवाय माणूस किती काळ जगू शकतो हे तुम्हाला माहीतीये का?

Photo Credit; instagram

Arrow

ज्या लोकांची वयानुसार खूप कमी ऊर्जा वापरली जाते ते अन्न आणि पाण्याशिवाय फक्त काही दिवस किंवा काही आठवडे जगू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

जे उपोषण करतात पण पाणी पिऊन राहतात, ते पाण्याने काही महिने किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अन्न आणि पाण्याशिवाय माणूस 8 ते 21 दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, महिलांनी दररोज 2.6 लिटर आणि पुरुषांसाठी 3.6 लिटर पाणी प्यायला हवं. हे पाणी ज्यूस आणि अन्नातून मिळू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

जर एखाद्याने पुरेसे पाणी प्यायले नाही तर शरीराच्या कार्यामध्ये बदल होतो. पाण्याशिवाय स्नायू आकुंचन पावतात. मेंदूतील स्नायूंमध्ये घट होते, ज्यामुळे किडनी अधिक ऊर्जेचा वापर करते आणि ऊतींचे नुकसान होते.

Photo Credit; instagram

Arrow

रक्तातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यासाठी मूत्रपिंडांना पुरेसे कार्य करणे आवश्यक आहे. पुरेशा पाण्याशिवाय किडनी काम करणे थांबवते ज्यामुळे शरीरातील अनेक अवयव काम करणं थांबवतात.

Photo Credit; instagram

Arrow

पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराचे तापमान बिघडते, इलेक्ट्रोलाइट्स असंतुलित होतात. सांधेदुखी, रक्तदाब कमी होणे यांसारख्या समस्या होतात. 

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच ऊर्जेचा अभाव, थकवा, क्रॅम्प्स, मेंदूला सूज येणे, किडनी निकामी होणे हे सर्व डिहायड्रेशनमुळे होतं.  

प्रेग्नेंट अभिनेत्रीने बेबी बंपसोबत फ्लॉन्ट केला खास टॅटू, Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा