ज्यांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नेहमीच कोणतेही अन्न खाल्ले तर त्यांच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता नेहमीच असते.
त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरातील ग्लुकोजची पातळी वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन न करणे हेच त्यांच्यासाठी फायद्याचे असते.
तुम्ही तुमचे जेवण कसे खाता त्यावरदेखील तुमच्या रक्तातील साखरचे प्रमाण अवलंबून असते. जर तुम्ही योग्य प्रकारे अन्न खाल्ले तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते.
त्यामुळे तुम्ही तुमचे नियमित अन्न योग्य क्रमाने खात असाल तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तुमची तुम्ही सहज नियंत्रित करू शकता.
तुम्ही घरी असाल तर आधी भाज्या, मग चिकन, मासे किंवा अंडी, मग भात आणि शेवटी काहीतरी गोड खाण्याचा प्रयत्न करा
तुम्ही हॉटेलमध्ये असाल तर जेवणापूर्वी कॉम्प्लिमेंटरी ब्रेड खाऊ नका. हे रिकाम्या पोटी खाल्ल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते.
गोड चहा किंवा ज्यूस सारख्या साखरयुक्त पेयांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळीवर वाढून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेवणासोबत काहीतरी गोड प्यायचे असेल तर ते जेवणानंतर प्यावे, त्याआधी अजिबात घेऊ नका.