भुजबळ, वळसे पाटलांचं नाव घेत राज ठाकरेंचं शरद पवारांबद्दल स्फोटक विधान
Photo Credit; instagram
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजलेली आहे. अशा स्थितीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेही सत्ताबदलावर काल (2 जुलै) आक्रमक झाले.
Photo Credit; instagram
महाराष्ट्रातील सत्तेच्या खेळावर राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. पुढे अजून काय पाहावं लागेल हा विचार करुन मन धस्स होतं असंही ते म्हणाले.
Photo Credit; instagram
आज (3 जुलै) पुन्हा राज ठाकरेंनी शीवतीर्थवरून माध्यमांसमोर संवाद साधला आहे.
Photo Credit; instagram
ते म्हणाले की, 'राज्यातील या घडामोडींचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे.'
Photo Credit; instagram
'राज्याचं राजकारण किळसवाणं होतं चाललं आहे. राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे.'
Photo Credit; instagram
'त्यांना मतदारांशी काही देणं घेणं नाही. मतदार का होते याचा विसर पडला आहे. स्वत: च्या स्वार्थासाठी जी तडजोड करताहेत ते महाराष्ट्राच्या जनतेने गांभीर्याने घ्यावं.'
Photo Credit; instagram
'पवार साहेबांचा पाठिंबा असल्याशिवाय दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ हे असंच जाणार नाही.'
Photo Credit; instagram
'सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही.' असं सूचक वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.
Sanath Jaysurya : अभिनेत्रीसाठी पत्नीला सोडलं अन् तिनेच स्टार क्रिकेटरचा केला गेम!