Maratha Reservation : 'कुणाचा मेसेज आला होता?', विधानसभेत प्रचंड घमासान

मुंबई तक

ADVERTISEMENT

आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ

point

सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर महायुती महाविकास आघाडीविरोधात आक्रमक

point

आशिष शेलारांचे महाविकास आघाडीवर गंभीर आरोप

Maratha Reservation, Maharashtra Politics : महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महायुती सरकारने बैठक बोलावली होती. पण, त्या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मविआच्या बहिष्काराच्या भूमिकेवरून महायुतीच्या आमदारांनी विरोधकांना विधानसभेत घेरले. भाजपचे आमदार अमित साटम, आशिष शेलार, नितेश राणे यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गोंधळ केला. (The MLAs of Mahayuti became aggressive after Maha vikas Aghadi leaders were absent from the all-party meeting on the reservation issue)

भाजपचे आमदार अमित साटम यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विरोधी पक्षाचे नेते आरक्षणावरील सर्वपक्षीय बैठकीला गैरहजर राहिल्याचा मुद्दा मांडला.

हेही वाचा >> मोबाईल सुरु केला अन्...; मिहीर शाहाला पोलिसांनी कसे पकडले? 

महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होत आहे. आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. विरोधकांनी त्यावर बहिष्कार घातला. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. यांना ना ओबीसींची पडलीये, ना यांना मराठ्यांची पडलीये. विरोधकांनी इथे जाहीर करावं की, ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही?, असा सवाल साटम यांनी केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पहा विधानसभेत काय घडलं?

 

Maratha Reservation : आशिष शेलार काय बोलले?

साटम यांच्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले, 

ADVERTISEMENT

काल (९ जुलै) सर्वपक्षीय बैठक बोलावली. अगोदर सांगितले येणार. आम्ही तुमच्याबरोबर येऊ चर्चा करू म्हणाले. मग ऐनवेळी असा कुणाचा निरोप येतो? कुणाला फोन येतो? कुणाचा मेसेज येतो? दुपारपर्यंत येतो... येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलविता धनी आहे? यांचा सभागृहाच्या बाहेर कुणीतरी बोलविता धनी आहे, जो सांगतो की बैठकीला तुम्ही जाऊ नका. मनोज जरांगेंच्या भूमिकाला तुमचं समर्थन असेल, तर तुम्ही बैठकीला का आला नाहीत? विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी. 

नितेश राणे म्हणाले की, "बैठकीला न जाणे यातून यांचे खरे चेहरे दिसले आहेत. विरोधी पक्षनेत्याची भूमिका काय आहे? त्यांना स्वतंत्र आरक्षण पाहिजे की, ओबीसी समाजातून आरक्षण पाहिजे? त्यांनी जाहीर करावं."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> '...तर 288 उमेदवार पाडले म्हणून समजा', जरांगेंनी थोपटले दंड

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे तीन वेळा उत्तर द्यायला उभे राहिले, मात्र सत्ताधारी आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे अनेक वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले गेले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT