डोंबिवली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत एकूण 27 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा देखील समावेश असल्याचं समजतं आहे. संजय लेले, अतुल मोने, अशी दोन पर्यटकांची नावं असून तिसऱ्या पर्यटकाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही.
ADVERTISEMENT
डोंबिवलीतील तिघांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण कुटुंबासमवेत शनिवारी काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. मृत झालेले तिघेही जण हे डोंबिवली पश्चिमेला राहणारे आहेत. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण डोंबिवलीत शोककळा पसरली आहे.
दरम्यान मृत झालेल्यापैकी काही जण हे शिंदे सेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे नातेवाईक आहेत. दरम्यान, या दहशतवादी हल्यात आपल्या नातेवाईकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला राजेश कदम यांनीही दुजोरा दिला आहे. ते बुधवारी पहाटे काश्मीरला रवाना होत असून मृतांचे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात आहेत असे कदम म्हणाले.
हे ही वाचा>> Terror Attack: पतीच्या मृतदेहाशेजारी पत्नी अन्... 'हा' फोटो तुमचं काळीज टाकेल पिळवटून!
डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरात राहणारे अतुल मोने त्यांच्यासोबत सुभाष रोड परिसरात राहणारे संजय लेले हे आपल्या कुटुंबासह काश्मिरला गेले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली मृतांविषयी माहिती
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून दिली आहे.
हे ही वाचा>> Kashmir Pahalgam Terror Attack: सर्वात मोठा दहशतवादी हल्ला, महाराष्ट्रातील किती जणांनी गमावले प्राण? एकूण 27 पर्यटक ठार
प्रशासनाने मदतीसाठी सुरू केला हेल्पडेस्क
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत पर्यटकांना मदत करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने पोलीस नियंत्रण कक्षात एक मदत कक्ष सुरू केला आहे. हे 24 तास उपलब्ध राहील. जिल्हा एसएसपी अनंतनाग यांच्या मते, हेल्पडेस्कचे दूरध्वनी क्रमांक आहेत- 9596777669, 01932225870. याशिवाय एक व्हाट्सअॅप क्रमांक आहे: 9419051940. पर्यटक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात आणि आवश्यक माहिती मिळवू शकतात.
ADVERTISEMENT
