सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं वृत्त समोर आल्यापासून या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा त्याच्या राहत्या घरातून फरार झाला होता. आता त्याला अटक केली आहे. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी देखील माफी मागितली. यावरुन राहुल गांधी यांनी देखील टीका केली आहे. माफी मागितल्यानंतरही राहुल गांधी या प्रकरणाचं राजकारण का करत आहेत यावर आहे सेंटर पॉईंट.