Vidhan Parishad election : "जे आमदार फुटले त्यांची नावे आज...", जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ

मुंबई तक

• 08:14 AM • 13 Jul 2024

Maharashtra Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला जबर धक्का दिला. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी पक्षालाच दगा दिल्याने खळबळ उडाली आहे. 

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड.

follow google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणूक निकाल २०२४

point

जितेंद्र आव्हाड यांची विधान परिषद निवडणूक निकालानंतर पोस्ट

point

महायुती सरकारने आमदारांना पाच कोटींची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप

Maharashtra mlc election : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत मोठा हादरा बसला. काँग्रेसची मतेच फुटल्याने महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार पराभूत झाला. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. प्रत्येक आमदाराला पाच कोटी आणि १०० कोटींची विकासकामे अशी ऑफर देण्यात आली होती, असा दावा आव्हाडांनी केला आहे. (NCP SP MLA Jitendra Awhad has made a serious claim that the Mahayuti government had offered Rs 5 crore to each MLA of Opposition parties)

हे वाचलं का?

"पाच कोटी रूपये आणि 100 कोटींची विकासकामे हा दर ठरला होता. तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण जनतेला घेऊ शकत नाहीत", असे जितेंद्र आव्हाड यांनी महायुतीला म्हटले आहे. 

जितेंद्र आव्हाडांनी विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. 'गद्दारांना महाराष्ट्र धडा शिकवेल', असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या आमदारांबद्दल संताप व्यक्त केला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट वाचा जशीच्या तशी....

"आज विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मते फुटली किंवा फोडण्यात आली, त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकासनिधी. म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ!" 

"विकासनिधी हा कुणी स्वतःच्या घरातून आणत नाही. जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकासनिधी म्हणून वापरला जातो. पण, या सरकारने तेही जमविले नाही."

MLC ELection : 'आमदारांना पाच कोटी आणि १०० कोटींच्या विकासकामांची ऑफर'

"या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला अन् त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत. म्हणजेच,  जनतेच्याच खिशाला कात्री लावण्याचे काम केले जातेय. पाच कोटी रूपये आणि शंभर कोटी रूपयांची कामे, अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती."

"काही पैशांच्या अमिषाला बळी पडले. स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही; स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार?"

'फुटलेल्या आमदारांची नावे...'

"आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. यानंतर पुढे विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. पण, जे आमदार फुटले आहेत; त्यांची नावे आज रात्री किंवा उद्या बाहेर पडणारच आहेत. त्यामुळे आपला आमदार पैसे घेऊन फुटला आणि पक्षाशी गद्दारी केली, हे पुन्हा एकदा जाहीर होईल."

"या गद्दारीविरोधात प्रचंड संताप जनतेच्या मनात आहे. गद्दारी करणाऱ्यांविरुद्ध तसेच गद्दारी करायला लावणार्‍यांविरोधातही जनतेच्या मनात रोष आहे. पाच कोटी रूपये आणि १०० कोटींची विकासकामे हा दर ठरला होता."

"तुम्ही हे देऊन आमदारांना विकत घेऊ शकता; पण, जनतेला घेऊ शकत नाहीत. तुम्ही आमदारांना विकत घेताना खूप पैसे वाटले आहेत. आमदारांना विकत घेताना खूप , अगदी हजार कोटी रूपयांचा विकासनिधी दिलात. पण, तुम्हाला कुठेच यश मिळू शकला नाही. म्हणून तुम्ही 17 वरच अडकले."

'तुमच्या घाणेरड्या सवयी...'

"तेव्हा जनतेला विकत घेऊ शकतो, या भ्रमात राहून आम्ही विधानपरिषद जिंकली आता विधानसभा जिंकू , हे विसरून जा. जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड राग आहे. आजनंतर अधिक राग निर्माण होईल की अजून तुमच्या घाणेरड्या सवयी गेलेल्या नाहीत."

    follow whatsapp