Rishabh Pant : संजू सॅमसनने ऋषभवर कशी केली मात? संघ निवडीची Inside Story

मुंबई तक

23 Jul 2024 (अपडेटेड: 23 Jul 2024, 05:19 PM)

Team India : रोहितने ऋषभ पंतला एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळेच संजू सॅमसनची T20 मध्ये निवड झाली, पण त्याला एकदिवसीय मालिकेतून बाजूला करण्यात आले.

संजू सॅमसन आणि ऋषभ पंत

ऋषभ पंत आणि संजू सॅमसन

follow google news

बातम्या हायलाइट

point

संजू सॅमनच्या निवडीची गोष्ट काय?

point

अजित आगरकर ऋषभ पंतबद्दल काय बोलला?

point

के.एल. राहुलची निवड का झाली नाही?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 आणि एकदिवसीय संघांची घोषणा केली तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले. विशेषत: भारतीय संघ निवडीच्या निकषांबाबत... ज्या खेळाडूची एकदिवसीय सामन्यात कामगिरी उत्कृष्ट होती त्याला त्या फॉरमॅटमधून वगळण्यात आले. या यादीत संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड या खेळाडूंचा समावेश होता. संजूने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावले होते, पण त्याला एकदिवसीय फॉर्मेटमधूनच वगळण्यात आले. त्याचवेळी नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वे टी-२० मालिकेत अभिषेक आणि गायकवाड यांची कामगिरी चांगली होती, तरीही दोघांनाही टी-२० मधून वगळण्यात आले.

हे वाचलं का?

'बीसीसीआय'शी संबंधित एका सूत्राने aajtak.in ला सांगितले की, जेव्हा ऋषभ पंत आणि संजू सॅमसनचा प्रश्न आला तेव्हा रोहित शर्माने या प्रकरणात हस्तक्षेप केला. 

संजू सॅमसनची टी२० संघात निवड

बीसीसीआयच्या बैठकीत रोहितने ऋषभ पंतला एकदिवसीय सामन्यात यष्टिरक्षक म्हणून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळेच संजू सॅमसनची T20 मध्ये निवड झाली, पण त्याला एकदिवसीय मालिकेतून बाजूला करण्यात आले.

हेही वाचा >> हार्दिक पंड्याला डावलून सूर्यकुमार यादवला का केलं कर्णधार?

'बीसीसीआय'च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वनडे मालिकेसाठी संजू सॅमसनची निवड करायची की ऋषभ पंतची, यावर चर्चा झाली. कारण एकदिवसीय विश्वचषकात विकेटकीपर म्हणून केएल राहुलची कामगिरी उत्कृष्ट होती. आता प्रश्न असा की, संजूने आपल्या शेवटच्या वनडेत शतक झळकावूनही तो संघाबाहेर का? याचे कारण आता समोर आले आहे. यात रोहित शर्माचा हस्तक्षेप महत्त्वाचा आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा T20 आणि ODI संघ गुरुवारी (18 जुलै) जाहीर करण्यात आला. पण, भारतीय क्रिकेट संघ निवडण्यासाठी बीसीसीआयची दोन दिवस बैठक झाली. म्हणजेच गुरुवारी आणि त्याच्या एक दिवस आधी 17 जुलै (बुधवार) रोजी.

हेही वाचा >> ICC पाकिस्तानला देणार झटका? टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार 

सूत्राने aajtak.in ला सांगितले की, दोन्ही दिवशी बैठक ऑनलाइन झाली. या बैठकीत भारतीय T20 विश्वचषक संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित होते. या सर्वांनी ऑनलाइन बैठकीला हजेरी लावली.

जय शाहांनी काय सांगितले?

aajtak.in ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी जेव्हा ऑनलाइन बैठक झाली, तेव्हा त्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह देखील उपस्थित होते. 18 जुलैला जेव्हा संघाची घोषणा झाली, तेव्हा ते बैठकीत नव्हते. त्याचवेळी, या बैठकीत जय शाह यांनीही एकदा निवडकर्त्यांना सांगितले की, संघ निवडण्याचा अधिकार फक्त त्यांनाच असेल.

अजित आगरकर काय म्हणाला?

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी 22 जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत संजू सॅमसनचा वनडेमध्ये समावेश न करण्याबाबत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली. आगरकरने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील केएल राहुलच्या फॉर्मचा उल्लेख केला. तर संजूबाबत अजित आगरकर म्हणाले की, कुणाला तरी बाहेर राहावं लागणार आहे. आगरकर म्हणाला की या दोघांना (केएल राहुल आणि ऋषभ पंत) कामगिरी करावी लागेल, अन्यथा त्यांच्या मागे अनेक खेळाडू आहेत जे त्यांची जागा घेऊ शकतात.

हेही वाचा >> ''टीआरपीसाठी सगळं...'', हेड कोच बनताच कोहलीबाबत स्पष्टच बोलला गंभीर 

आगरकरने असेही सांगितले की, पंतला अपघात झाल्यानंतर केवळ टी-20 खेळला आहे, त्यामुळे तो एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

    follow whatsapp