Belapur Train Accident : लोकल पकडायला गेली अन् दोन्ही पाय..., नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai rain news navi mumbai belapur train accident women slipped and fell on the track local train runs over her loses both legs
गर्दी दरम्यान एक महिला रुळावर कोसळल्याची घटना घडली आहे.
social share
google news

Mumbai Local Train Accident : मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडतोय. या पावसामुळे रेल्वे स्थानकात (Belapur Railway Station) प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. या गर्दी दरम्यान एक महिला रुळावर कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत महिला (Women Accident) फक्त रुळावरच पडली नाही, तर तिच्या अंगावरून ट्रेन देखील गेली आहे. या अपघातात सुदैवाने महिलेचा जीव वाचला आहे, पण तिला पाय गमावावे लागले आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.  (mumbai rain news navi mumbai belapur train accident women slipped and fell on the track local train runs over her loses both legs)  

मुंबईत सकाळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकात नोकरदारांची प्रचंड गर्दी जमली होती. लोकल सेवा उशिराने सुरू असल्याने ही गर्दी वाढतच होती.या गर्दी दरम्यानच बेळापूर रेल्वेस्थानकात अपघाताची घटना घडली आहे. 

पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकावर येत होती. यावेळी लोकल पकडण्याच्या नादात एक महिला पाय घसरून थेट रुळावर कोसळळी होती. याच दरम्यान ट्रेन सुटल्याने तिच्या अंगावरून महिलेचा पहिला डब्बा गेला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Pune Hit and Run : पुणे हादरले! इनोव्हा उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

या दरम्यान काही प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत ट्रेनची इमरजंन्सी चैन खेचली होती. ज्यामुळे लगेचच मोटरमनने ट्रेन थांबवण्यात आली होती. यावेळी महिलेचा जीव वाचावा या दृष्टीने ट्रेन पुन्हा पुन्हा मागे घेण्यात आली होती. यादरम्यान सुदैवाने या अपघातातून महिला बचावली होती. मात्र तिला दोन्ही पाय गमवावे लागले होते. या घटनेनंतर महिलेला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

नवी मुंबईच्या सीबीडी  रेल्वेस्थानकावरती ही घटना घडली आहे. या घटनेत महिलेचा जीव तर वाचला पण तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले. या संदर्भातला अपघाताचा व्हिडिओ देखीस समोर आला आहे. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

ADVERTISEMENT

दरम्यान मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे पुर्णपणे विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचले आहे. ज्यामुळे लोकल पासून एक्सप्रेस बंद आहेत. वेस्टर्न रेल्वे धीम्या गतीने सुरु आहे. 

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री काय म्हणाले? 

मुंबईतील ही संपूर्ण परिस्थिती पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गरज असेल तर घराबाहेर पडा, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे.मुंबईतील या पुरस्थितिची आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या आढाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील पुरस्थितीची माहिती दिली. मुंबईत 267 मीमी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुरस्थिती निर्माण झाली होती. रेल्वे ट्र्रॅकवर पाणी आल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. रेल्वेचे 200 आणि पालिकेचे 481 पंप असल्याकारणाने पाण्याचा निचरा होत आहे. पाणी निचरा झाल्याने रेल्वे सेवा सुरळीत होत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Raju Shinde : ठाकरेंचा भाजपला मोठा झटका! शिंदेंमुळे कुणाची जागा धोक्यात?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT