TRF: 'मोदी को जाके बताओ...', असं म्हणत पर्यटकांना ठार मारणारे नराधम कोणत्या संघटनेचे?

मुंबई तक

The Resistance Front :  कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

The Resistance Front History
The Resistance Front History
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या टीआरएफ संघटनेनं केलं टार्गेट किलिंग

point

दहशतवाद्यांची TRF संघटना आहे तरी काय? 

point

जाणून घ्या या संघटनेबाबत सविस्तर माहिती

The Resistance Front :  कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील मंजूनाथ यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. पतीला डोळ्यांसमोरच गोळ्या झाडल्याने पत्नी पल्लवीच्या रडू कोसळलं. यावेळी पल्लवी दहशतवाद्यांना म्हणाली मला का सोडताय, मलाही मारून टाका..यावर दहशतवादी म्हणाले, महिलांना आणि मुलांना मारणार नाही.

जा मोदीला जाऊन सांग.. 22 एप्रिलच्या दुपारी पहलगामच्या बैसरन इथे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी (TRF) म्हणजेच द रेजिस्टेंस फ्रंटने घेतली. ही TRF दहशतवादी संघटना नेमकी काय आहे? या संघटनेमागची स्टोरी काय? काश्मीरवर यापूर्वी कधी हल्ला झालाय? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती. 

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगामच्या बैसरनमध्ये दहशतवादी  पोलिसांच्या ड्रेसकोडमध्ये पोहोचले होते. या ठिकाणी पर्यटक हॉर्स राईडींग करत होते. अचानक हे दहशतवादी आले आणि त्यांनी फायरिंग सुरु केली. या हल्ल्यात अनेक निष्पाप जणांचा बळी गेला. दहशतववाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारुन त्यांच्यावर गोळया झाडल्या. द रेजिस्टेंस फ्रंट म्हणजेच TRF ने या हल्ल्याची जबाबदारी घेतलीय. 

दहशतवाद्यांची TRF संघटना आहे तरी काय? 

TRF ही गेल्या काही वर्षांपासून जम्मू आणि कश्मिरमध्ये सक्रिय असलेली दहशतवादी संघटना आहे. ही संघटना लष्कर ए तैयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघचनेची एक शाखा समजली जाते. पाकिस्तानमधये बसलेला शेख सज्जाद गुल या संघटनेचा प्रमुख. त्याच्याच इशाऱ्याने जम्मू काश्मीरवर सातत्यानं दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानी सेना आणि आयएसटी TRF च्या मागून मदत करतं. 

TRF काय हे समजून घेण्याआधी आपल्याला लष्कर ए तैयबा ही दहशतवादी संघटना नेमकी काय? ते समजून घ्यावं लागेल. 1992 पासून लष्कर ए तैयबाची जम्मू काश्मीरमध्ये अॅक्टीव्हीटी सुरु झाली. सुरुवातीला घुसखोरी, स्थानिक काश्मीरी पंडीतांवर हल्ले हे कामही संघटना करायची. भारत सरकारने लष्कराला प्रतिबंधीत संघटनांच्या यादीत टाकलं, त्यानंतहरी देशाात अनेक दहशतवादी हल्ले सरुच होते, यामध्येही निष्पाप लोकांचे बळी गेले. 

हे ही वाचा >> Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांची संपूर्ण यादीच आली समोर!

2019 मध्ये भारत सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवलं . त्यानंतर या दहशतवाद्यांनी एक नवीन संघटन बनवलं ज्याचं नाव होतं TRF. द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेला काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल मुजाहिदिन संघटनेची साथ मिळाली. 
तेव्हापासून आतापर्यंत TRF ने अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.

गृहममंत्रालयाने मार्चमध्ये राज्यसभेत बोलताना असं सांगितलं होतं की, टीआरएफ ही दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा चाच एक चेहरा आहे. 2019 ही संघटना अस्तित्वात आली. या संघटनेला पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI कडून आर्थिक मदत मिळते. दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं नाव समोर येऊ नये, यासाठी ही संघटना बनवण्यात आली. 

2019 च्या पुलवामा हल्लयानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा समोर आला. जैश-ए-मोहम्मदने हा हल्ला घडवून आणला आणला होता. त्यानंतर पाकीस्तानने वाढता दबाव लक्षात घेता पाकिस्तानी लष्कर आणि ISI ने TRF ही संघटना तयार केली. कारण या संघटनेआडून पाकिस्तानला आपलं लक्ष्य पुर्णत्वास नेता येईल. 

हे ही वाचा >> मुलाची 10वीची परीक्षा संपली म्हणून काश्मीरला नेलं, पण... डोंबिवलीच्या हेमंत जोशींना बायको-मुलासमोरच संपवलं!

निष्पाप नागरिकांची हत्या, शस्त्रास्त्रांची तस्करी, दहशतवाद्यांची भरती महत्वाचं म्हणजे , गैर काश्मिरांना लक्ष्य करणं ही काम TRF करते.बाहेरील राज्यांमधील लोक जम्मू काश्मीरमध्ये येऊ नतेय म्हणूम गैर काश्मिरी लोकांना TRF टार्गेट करते. 2020 मध्ये कुलगाममध्ये भाजप कार्यकर्ते फिदा हुसेन, उमर रशीद बेग, आण उमर हजाम यांची निर्घृण हत्या केल्यानंतर TRF चर्चेत आली होती. 1 एप्रिल 2023 ला कुपवाड्यात झालेल्या हल्ल्यात 5 जवानांची हत्या झाली.

रियासी बस हल्ल्यात 9 जाणांचा मृत्यू, 47 जण जखमी झाले होते. श्रीनगरमध्ये एका काश्मिरी पंडीत, शाळेमध्ये सिख आणि अध्यापताची हत्या झाली. 90 च्या दशकात काश्मीर पुन्हा घेऊन जायचंय तोच काळ पुन्हा आणायचाय, असं बोललं जातं. भारताने 2023 मध्ये UAPA कायद्याअंतर्गत या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करुन बंदीही आणलीय.

हे वाचलं का?

    follow whatsapp