‘त्या’ 41 जीवांसाठी अखंड डोंगर पोखरला अन् जिंकले युद्ध, रेस्क्यू टीमचा कसा होता प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttarkashi silkyara tunnel rescue operation 41 lives steely heart struggle family patience spirit sussessful excavation
uttarkashi silkyara tunnel rescue operation 41 lives steely heart struggle family patience spirit sussessful excavation
social share
google news

Silkyara Tunnel : गेल्या 17 दिवसांपासून एका बोगद्यामध्ये 41 जीव 17 दिवस अडकून पडले होते. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न चालू होते. एका बाजूला डोंगरासारख्या असणाऱ्या त्या बोगद्याचे संकट होते, तर दुसरीकडे जीव वाचवणाऱ्या टीमचेही मोठे धाडस होते. त्या बोगद्यातील 41 जणांच्या धडधडणाऱ्या जीवांना अनेक हातांचे बळ मिळाल्यामुळेच 41 मजूरांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसून आला होता. या 17 दिवसांमध्ये उत्तरकाशीतील बचाव पथकाने एका पर्वतापेक्षाही मोठं काम करुन 41 माणसांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

कारही आणि विमानंही सज्ज

सिल्क्यरा बोगद्यात 13 नोव्हेंबर रोजी 41 जीव अडकल्याची बातमी समोर आली. तेव्हापासून त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी लागणारी यंत्रे देशाच्या विविध भागातून घटनास्थळी आणण्यात आली. हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली त्याच बरोबर हवाई दलाची विमानंही या कामासाठी सज्ज राहिली. रेल्वेपासून ते अगदी सर्व सुविधांनी मदत कार्यासाठी सर्व गोष्टी तयार ठेवण्यात आल्या. एसडीआरएफ आणि एनडीआरएफ ते बीआरओपासून ते आयटीबीपीपर्यंत आणि हवाई दलापासून पोलीस प्रशासनापर्यंत या सगळ्या यंत्रणांनी 41 जीवांसाठी प्रचंड प्रयत्न केले.

जीवाची बाजी

ज्या टनेलमध्ये 41 जीव अडकले होते, त्यांच्यासाठी ना दिवस पाहिला ना रात्र पाहिली गेली. ना अन्नाची चिंता होती ना झोपेचा त्रास होता. कडाक्याच्या थंडीतही बचाव पथकातील प्रत्येकाने आपल्या जीवाची बाजी लावून जीवांना सुखरूप बाहेर काढले. हा प्रवास त्यांच्यासाठी सोपा नव्हता कारण गरज पडली तेव्हा त्यांनी अखंड डोंगर पोखरले आणि बोगद्यात शिरून प्रत्येक संकट पार केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

देश-विदेशातून तज्ज्ञांना पाचारण

दिल्लीपासून डेहराडूनपर्यंत, पीएमओपासून ते सीएमओपर्यंत, जिल्ह्यापासून ते विभागीय पातळीपर्यंत, मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि पोलिसांपासून प्रशासनापर्यंत केवळ एका मिशनवर 24 तास काम करण्यात आले. त्यामुळेच 41 जीवांचे प्राण वाचले. या बचाव कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी देश-विदेशातून गरज असेल तेथून तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आणि मजूरांचा जीव वाचवण्यात आला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Uttarkashi Tunnel Rescue Live Updates: आनंदाची बातमी, मृत्यूवर मात करत बोगद्यात अडकलेले 41 कामगार आले बाहेर!

प्रत्येकाचे मनोबल वाढले

या 17 दिवसात 4 इंच पाईपच्या माध्यमातून 9 दिवस अन्नाचा पुरवठा करण्यात आला, त्यामुळेच मजूरांचे प्राण वाचले. यामध्ये रेस्क्यू टीमला पहिले मोठं यश मिळाले ते 6 इंची पाईप कामगारांपर्यंत पोहोचवण्यात आला. त्यामुळेच त्यांना अन्न पाठवण्यात आले. त्यामुळेच यामधील प्रत्येकाचे मनोबल वाढले, आणि कामगारांच्या कुटुंबीयांच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला.

ADVERTISEMENT

बचावकार्य सुरू

बोगद्यात अडकलेल्या 41 जीव वाचवण्याचा इतका प्रयत्न करण्यात आला की, एकाच वेळी वेगवेगळ्या पातळीवर 6-6 प्रोजक्टवर काम करण्यात आले. मजूरांचा जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न सुरु करण्यात आला. या प्रयत्नामुळेच बचावकार्याला यश मिळाले. पहिल्या दिवसांपासून उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना बाहेर काढण्याच्या मार्गात अनेक अडथळे आले. त्या अपघातानंतर बचावकार्य सुरू होताच, काही तासांमध्येच मशीनमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दिल्लीहून तात्काळ अमेरिकन ऑगर मशीन मागवण्यात आले आणि तेव्हापासून याच मशीनच्या सहाय्याने डोंगर पोखरत 41 जणांचा जीव वाचवण्यासाठीची लढाई सुरू झाली.

ऑगर मशीन

सिल्कियराच्या या बोगद्यात ज्या 41जणांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले गेले त्याची धडपड फक्त बचाव कार्यातील सदस्यांनाच माहिती होती. कारण कित्येक वजनदार यंत्रसामग्री डोंगराळ भागातील बोगद्याजवळ घेऊन जाणे, त्याठिकाणी मोठी वाहनं जाणंही अशक्य होती. मात्र बचाव कार्य थांबले नाही. त्या ठिकाणी यंत्रसामुग्री पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्यात आले. यामध्ये सगळ्यात महत्वाची मशीन होती, ती म्हणजे अमेरिका ऑगर मशीन.

बचाव कार्याकडे एकमेव मशीन

बोगदा कोसळल्यानंतर तात्काळ तिथे उपलब्ध असलेल्या सुविधांपासूनच बचावकार्याला सुरुवात झाली. मात्र काही तासातच त्यामध्ये बिघाड झाला. त्याचवेळी बचाव पथकाकडून मोठ्या मशीनची मागणी करण्यात आली. त्यामुळे ताबडतोब अमेरिकन ऑगर मशीन दिल्लीहून उत्तरकाशीला हवाई दलाच्या विशेष विमानाने दाखल करण्यात आले. जे मशीन मागवण्यात आले, ते साधे मशीन नव्हते कारण डोंगर पोखरणारे ते एकमेव मशीन बचाव कार्याकडे होते. डोंगर पोखरण्यासाठी 1750 हॉर्स पॉवरच्या डिझेल इंजिनच्या मदतीने बचाव कार्याला सुरुवात झाली. मात्र हे मशीनच्या साहाय्याने डोंगर पोखरता येत असला तरी ते घटनास्थळी दाखल करण्यासाठी बचाव कार्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. मात्र बचाव कार्यातील प्रत्येकाने ते कार्य मनापासून पार पाडले होते.

पर्वत पोखरला

जेव्हा ऑगरच्या जड रोटरने पर्वत पोखरला जाऊ लागला तेव्हा एका दिवसात 24 मीटरचा भाग पोखरला जात होता. त्यावेळी अनेक अडचणी बचाव कार्याला आल्या. हे काम चालू असताना अचानक मशीनच्या वाटेत खडक लागला होता. तो फोडण्यासाठी ऑगर सुरु केला जात होता. त्यावेळी त्या डोंगराळ भागात कंप निर्माण झाले. कंपने सुरु झाल्यानंतर बोगद्यातील काही भाग कोसळत असल्याचे मजूरांनी सांगितले आणि ते काम तात्काळ थांबवण्यात आले.

मशीन गेले तेव्हा

हे ऑगर मशीन टीबीएम मशीनपेक्षाही अधिक लहान होते. मात्र हे मशीन चालू होते तेव्हा ते कसलाही अडथलळा अगदी सहज पार करू शकते. बाटलीच्या वरील भागाप्रमाणे असणारे टीबीएमचे कटर डोंगर, खडक, वाळू आणि माती पोखरत सहज जात असते. मात्र हे करत असताना त्याचवेळी बोगद्यात माती पडणार नाही याचीही ते काळजी घेते. ज्यावेळी सिल्क्यरा बोगद्यात टीबीएम ऐवजी छोटे ऑगर मशीन गेले तेव्हा ते आतील माती सगळी बाहेर काढत होते.

कामगारांना बाहेर काढण्याची तयारी

बोगद्यात अडकलेल्या त्या 41 जीवांसाठी ऑगर मशीनने काढलेल्या त्या पोखलेल्या जागेतून 900 मिमी व्यास असलेल्या पाईप आत टाकण्यात आल्या. त्यातूनच कामगारांना बाहेर काढण्याची तयारीही करण्यात आली. त्यामुळे बोगद्यातून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हे बचाव कार्य किती अवघड होते, ते यावरूनच लक्षात येते. कारण 12 मीटरचे अंतर कापण्यासाठी 12 तास लागणार असं सांगण्यात आले होते.

आशेचा किरण

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी डोंगर पोखरण्यात आला. कित्येक तासांनी नंतर बोगद्यातील मजूरांजवळ गेल्याची चिन्हं दिसू लागली तेव्हा बचाव कार्य आणखी नाजूक पणे करण्यात येऊ लागले. कारण ज्या 41 मजुरांची दिवाळी अंधारात गेली होती, त्यांचे श्वास बोगद्यातच बंदिस्त झाले होते. मात्र त्यांना ज्यावेळी बचाव कार्याचे कामाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचला तेव्हा मात्र त्यांना आपल्या जीवनात पुन्हा आशेचा किरण दिसू लागला.

संयम आणि धैर्य

17 दिवसांनंतर जेव्हा सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या मजुरांची स्पष्ट छायाचित्रे जगासमोर आली तेव्हा मात्र मजुरांचे धाडस जगासमोर आले. बोगद्याबाहेरील लोकांची मानसिक स्थिती कशीही असली तरी बोगद्याच्या आत उपस्थित कामगारांनी संयम आणि धैर्य दाखवले होते. पहिल्यांदाच सिल्क्यरा बोगद्यातील 12 मजुरांची स्पष्ट छायाचित्रे समोर आली आणि सर्व मजुरांच्या कुटुंबीयांच्या आशा पल्लवितही झाल्या.

माणसांची सुखरूप सुटका

या दोन आठवड्यात आपल्या माणसांचा जीव धोक्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र कुटुंबीयांचे मनोधैर्य खचले होते. मात्र ज्यावेळी बचाव पथकाने बोगद्यातील चित्र जगासमोर आणले आणि कुटुंबीयांना आशा वाटू लागल्या.बोगद्यात अडकलेल्या लोकांची छायाचित्रे पाहिल्यानंतर मात्र बाहेर असलेल्या कुटुंबियांना खात्री झाली की, आपल्या माणसांची आता सुखरूप सुटका होणार आहे. लखीमपूर खेरी येथील मजूर असलेल्या मनजीतचे वडील आपल्या मुलाच्या जुन्या कामांविषयी ते भावूकपणे सांगत होते.

जीवात जीव

बोगद्यात अडकलेल्या मजुरांमध्ये संतोष हा उत्तर प्रदेशातील श्रावस्तीचा रहिवासी होता. त्याच्या भावाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो उत्तरकाशीला पोहोचला होता. सहा इंच पाईपची सुविधा दिल्यानंतर अशोकने भावाबरोबर बोलणं चालू केलं. बोगद्याच्या आतील चित्रं दिसल्यानंतर त्याच्या जीवात जीव आला आणि त्याला आपल्या भावाला कधी भेटतो असं झालं.

बचाव पथकाकडे धाव

संतोष आणि मनजीतसारख्या 41 जणांच्या कुटुंबांचीही हीच अवस्था होती. ज्यावेळी हे सगळे बाहेर आले त्यावेळी सगळेच जण त्या बोगद्याकडे क्षणभर पाहत होते, आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी बचाव पथकाकडे धाव घेतली त्यांच्यासमोर हात जोडले आणि ते रुग्णालयाकडे रवाना झाले.

हे ही वाचा >> Deepak Kesarkar अचानक का गेले नारायण राणेंच्या घरी? ‘त्या’ बॅगेतून राणेंना काय दिलं?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT