Chanakya Niti : प्रेमात मिळालाय धोका? चाणक्य नीतीच्या 'या' 4 गोष्टी लक्षातच ठेवा, प्रेमही वाढेल अन् नातंही टीकेल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Chanakya Niti On love Relationships
Chanakya niti on love
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेमसंबंधात दुरावा येऊ नये, यासाठी आचार्य चाणक्य काय सांगतात?

point

आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीती शास्त्रांमध्ये नेमकं काय म्हटलंय?

point

आचार्य चाणक्यांच्या 'या' चार गोष्टी कायम लक्षात ठेवा

Chanakya Niti On Love Life : आचार्य चाणक्यांनी आपल्या जीवनात वेगवेगळ्या परिस्थितींचा सामना केला आहे. पण त्यांनी कधी हार मानली नाही आणि ध्येय पूर्णत्वाकडे लक्ष केंद्रित केलं. जर एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं पालन करत असेल, तर तो जीवनात कधीच चुका करणार नाही आणि यशस्वी होईल, असं बोललं जातं. आचार्य चाणक्यांनी त्यांच्या नीती शास्त्रात मानव कल्याणासंबंधीत सर्व विषयांचं विश्लेषण केलं आहे. कोणत्या परिस्थितींचा सामना करावा लागतो, हे चाणक्यांच्या नीती शास्त्राच्या माध्यमातून तुम्हाला कळू शकतं.

या नीती ग्रंथांत लिहिलेल्या गोष्टींचा जीवनातील सत्य समजवण्याचा प्रयत्न असतो. आचार्य चाणक्यांनी प्रेम संबंधांबाबतही त्यांचे विचार व्यक्त केले आहेत. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, चांगला संवाद असेल, तर प्रत्येक नात्यात सुख-शांती नांदू शकते. जर कपलमध्ये वादविवाद निर्माण झालं, तर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण व्हायला वेळ लागत नाही. प्रेमसंबंधात आलेला कटुपणा दूर करण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

हे ही वाचा >> Viral Video : 'मुन्नी बदनाम गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स'; 'IIT Bombay' चा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

पार्टनरचा आदर करा

आचार्य चाणक्यांच्या नीतीनुसार लोकांनी त्यांच्या पार्टनरचा आदर केला पाहिजे. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या पार्टनरला सर्वांसमोर अपमानित केलं, तर त्या व्यक्तीचा आत्मसन्मान दुखावू शकता. तसच स्वत:चाही मान सन्मान कमी होऊ शकतो. असं केल्यानं प्रेम संबंधांत दुरावा येऊ शकतो. त्यामुळे कपलने एकमेकांचा आदर केला पाहिजे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अहंकारापासून दूर राहा

जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल, तर मनात अहंकारी वृत्ती ठेऊ नका. प्रेम संबंधांमध्ये जर अंहकार आला, तर तुम्ही तुमच्या पार्टनरचं अस्तित्व कमी करू शकता. तसच पार्टनरचं महत्त्वही तुम्हाला कळणार नाही. यामुळे नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कपलने प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेणं आवश्यक आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Weather : महाराष्ट्रावर संकटाचं सावट! नेमकी कुठे काय स्थिती?

अतूट विश्वास ठेवा

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये अतूट विश्वास असला पाहिजे. ज्या नात्यात विश्वास असतो, त्यावेळी कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याती ताकद निर्माण होते. ज्या नात्यात विश्वास कमी आणि संशय जास्त असतो, ते नातं तुटण्याची शक्यता असते.

ADVERTISEMENT

थोडं स्वातंत्र्यही आवश्यक

आचार्य चाणक्य सांगतात, नातेसंबंधात स्वातंत्र्य असणं खूप आवश्यक आहे. ज्या नात्यात स्वतंत्रता असते, ते नातं मजबूत असतं. पण ज्या नात्यात स्वातंत्र्य नसतं ते नातं तुटतं. यासाठी नात्यात एकमेकांना स्पेस देणं आवश्यक आहे.

ADVERTISEMENT

टीप - सूत्रांच्या आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. चाणक्य नीतीनुसार सांगितलेली माहितीची मुंबई तक कोणत्याही प्रकारची पुष्टी करत नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT