Kirit Somaiya: 'अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका', किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ

रोहित गोळे

ADVERTISEMENT

किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ
किरीट सोमय्यांचा लेटरबॉम्ब... भाजपमध्ये मोठी खळबळ
social share
google news

बातम्या हायलाइट

point

किरीट सोमय्या यांच्या पत्राने भाजपमध्ये मोठी खळबळ

point

भाजपने निवडणूक आयोग संपर्क प्रमुखपदी केली होती नियुक्ती

point

सोमय्या म्हणतात अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका

Kirit Somaiya BJP: मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये बऱ्याच घडामोडी होत असताना दुसरीकडे भाजपचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांच्या एका पत्राने पक्षात एकच खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा निवडणुका या आता लवकरच जाहीर होतील त्या दृष्टीने भाजपने विधानसभा निवडणूक 2024 व्यवस्थापन समिती तयार केली आहे. पण याच समितीमुळे किरीट सोमय्या हे प्रचंड खवळले असून त्यांनी निवडणूक समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अत्यंत खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. (kirit somaiya said chandrashekhar bawankule and raosaheb danve dont be treated like this kirit somaiya letterbomb big stir in bjp)

नेमकं प्रकरण काय? 

भाजपकडून विधानसभा निवडणूक 2024 व्यवस्थापन समितीची आज (10 ऑगस्ट) घोषणा करण्यात आली. सुरुवातीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, ही यादी प्रसिद्ध होताच किरीट सोमय्या मात्र, चांगलेच संतापले. त्यानंतर त्यांनी एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. आतापर्यंत आपल्यावर पक्षाने अन्याय केल्याची भावना या पत्रातून त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

किरीट सोमय्या यांनी आपला राग व्यक्त करताना पत्रात म्हटलंय की, त्यांना न विचारता निवडणूक समितीत त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ही पद्धत चुकीची आहे. सोमय्या हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पत्राच्या शेवटी थेट असंही म्हटलं की, 'आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये.' यामुळे किरीट सोमय्या हे प्रचंड नाराज असल्याचं दिसून येत आहे. 

किरीट सोमय्यांचं 'ते; पत्र जसंच्या तसं...

Dr. Kirit Somaiya
Chartered Accountant, Ph.D Former Member of Parliament
Bharatiya Janata Party

ADVERTISEMENT

संदर्भ: केएस / मुंबई/02/1566/2024
दि. 10 सप्टेंबर, 2024

ADVERTISEMENT

प्रिय रावसाहेब,

आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे. आपण यासाठी अन्य कोणाचीतरी नियुक्ती करावी.

18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजपा-शिवसेना यांची ब्ल्यू हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री. उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजपा नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले तेव्हा पासून आजपर्यंत मी भाजपाचा एक सामान्य सदस्य / कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. 

मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जवाबदारी मी स्वीकारली होती, माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्लेही झाले तरीही मी जवाबदारी पार पाडली.

गेली साडेपाच वर्ष सामान्य सदस्य म्हणून आपण माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे. 

या विभानसभा  निवडणुकीसाठीही मी स्वतः ला पूर्णपणे झोकून दिले आहे. मी काम करतो, करीत राहणार.

आपल्या या समितीचा मी सदस्य नाही. आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अश्या प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशी विनंती करतो.

धन्यवाद !

आपला.
किरीट सोनिया (डॉ. किरीट सोमैया)

श्री. रावसाहेब दानवे
अध्यक्ष
निवडणूक प्रचार समिती
भाजपा, महाराष्ट्र.

प्रत : श्री. चंद्रशेखर बावनकुळे, अध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र.

 

किरीट सोमय्या यांच्या याच पत्रानंतर भाजपने तात्काळ सोमय्या यांचं नाव वगळण्यात आलं. त्यांच्या जागी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून विश्वास पाठक यांची नियुक्ती करण्यात आली. 

किरीट सोमय्यांचं तिकीट 2024 लोकसभेलाही कापण्यात आलं

2017 साली मुंबई महापालिका निवडणूक पार पडली होती त्यावेळी भाजप-शिवसेना हे राज्यात सत्तेत होते पण असं असूनही महापालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली होती. ज्यानंतर मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोपही त्यांनी केले होते. 

याच गोष्टीची सल ही शिवसेना नेतृत्वाला लागून होती. त्यामुळे जेव्हा 2019 लोकसभा निवडणुकीवेळी जेव्हा शिवसेना-भाजप युती झाली तेव्हा त्यांनी सर्वात आधी किरीट सोमय्या यांना विरोध केला. युतीच्या घोषणेआधी जी पत्रकार परिषद पार पडली त्या पत्रकार परिषदेतून सोमय्या यांना भाजप नेत्यांनी बाहेर जाण्यास सांगितलं होतं. 

एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने सोमय्यांच्या नावाले केलेला विरोध यामुळे भाजपने किरीट सोमय्या यांचं तिकीट कापून ऐनवेळी मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली होती. 

दरम्यान, महाराष्ट्रात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय समीकरणं बदलली त्यानंतर पुन्हा एकदा सोमय्यांनी शिवसेनेविरोधात रान उठवलं होतं. त्यामुळे 2024 लोकसभेला त्यांना पक्षाकडून तिकीटाची अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने किरीट सोमय्या यांना मोठा धक्का बसला होता. 

'फडणवीसांच्या सांगण्यावरून ठाकरेंवर अॅटक', चावडीवर सोमय्यांनी केलेला गौप्यस्फोट

दरम्यान, ऐन लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी मुंबई Tak चावडीवर एक प्रचंड मोठा गौप्यस्फोट केला होता. ज्यामध्ये त्यांनी थेट सांगितलं होतं की, फडणवीसांच्या सांगण्यावरूनच त्यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला होता किंवा भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 

चावडीवर नेमकं काय म्हणाले होते सोमय्या?

'तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं की, मातोश्रीवर अटॅक करा? तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का?', असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता. 

या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, "एक गोष्ट सगळे मान्य करतात की, किरीट सोमय्या हा पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. यात आलं सगळं उत्तर. माझ्या पक्षाने मला ज्या-ज्या वेळी जे-जे सांगितलं, ते मी केलं."

"मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो की, हसन मुश्रीफचा असो... संशोधन माझं, कमिटमेंट माझी, आक्रमकपणा माझा, पण पहिली राजकीय चर्चा आम्ही करतो. त्यात झालं की, गो अहेड (सुरू करा.) मग झालं", असं किरीट सोमय्या म्हणाले.

याच प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी माझी स्वतःचीच इच्छा होती की, मुंबई महापालिका... त्याचा जो भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेला या मातोश्री आणि त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना ते आवडलं. दिल्लीला पटलं. आणि त्यांनी सांगितलं." 

"मी त्यांना सांगितलं होतं की, ठाकरे नको, आपण त्याच्याशिवाय सगळे भ्रष्टाचार... देवेंद्रजींनी सांगितलं की, हा पक्षाचा आदेश आहे की, त्यांनी जो काही गोंधळ घातला असेल, जो महापालिकेशी संबंधित असेल, तर काढायला हवा.'' असं सोमय्या म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT