OBC: 'माझा फोकस आता त्यांच्या सालस उपोषणाकडे', पंकजा मुंडेंकडून हाकेंचं कौतुक पण निशाणा जरांगेंवर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

pankaja munde vs manoj jarange: मुंबई: ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री येथे उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांची सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत हाकेंचं कौतुक केलं तर मनोज जरांगे यांना अप्रत्यक्षपणे अनेक टोले लगावले आहेत. (obc reservation my focus on their hunger strike pankaja munde praises laxman hake but targets manoj jarange)

'लक्ष्मण हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाबाबत माझ्या मनामध्ये आदर असा आहे की, त्यांची भाषा, त्यांचं बोलणं.. त्यांचे विचार मांडणं या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. कोणाला ललकारणं, बाह्या सारणं ही त्यांची भूमिकाच नाही..' असं म्हणत पंकजा मुंडेंनी एक प्रकारे मनोज जरांगेंवरच निशाणा साधला आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघात निसटता पराभव झाला. मराठा आणि ओबीसी असं मतविभाजन झाल्यामुळे हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. ज्यानंतर आता पंकजा मुंडे या पुन्हा एकदा ओबीसी नेत्या म्हणून सक्रीय झाल्या आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या..

'लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे यांचे सहकारी यांनी उपोषणकर्त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांचं म्हणणं आहे की चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले असतील तर ते तपासले पाहिजे. चुकीचे असतील तर ते रद्द केले पाहिजेत. ही मागणी अत्यंत न्याय्य आहे.. त्यामध्ये कोणाला वाईट वाटण्याचं कारण नाही.' 

'लक्ष्मण हाके आणि वाघमारेंच्या उपोषणाबाबत माझ्या मनामध्ये आदर असा आहे की, त्यांची भाषा, त्यांचं बोलणं.. त्यांचे विचार मांडणं या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत. कोणाला ललकारणं, बाह्या सारणं ही त्यांची भूमिकाच नाही.. त्यामुळे माझा फोकस आता त्यांच्या सालस उपोषणाकडे आहे.. मी त्यांच्या बाजूने यामुळे विचार करते की, त्यांचे जे मुद्दे आहेत. ते खरे असतील तरच त्यांच्या बाजूने राहील ना.. हा विषय क्लिअरच होईल ना..'

ADVERTISEMENT

'त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून एक आदर वाटतो.. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला लक्ष दिलं पाहिजे.. बाकी कोण काय बोलतं त्यावर उत्तर देणं गरजेचं नाही.' 

ADVERTISEMENT

'आता जे चित्र आहे प्रचंड दुर्दैवी आहे.. तुम्ही माझी वक्तव्य काढून बघा..  ओबीसी आणि मराठा हे दोन्ही मिळून बहुजन होते. आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते.' 

'म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काही तरी बोलावं अशा प्रकारचं पाऊल कधी उचललं नाही. मला असं वाटतं की, या महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या लोकांनी सर्व समाजानी एकत्र वावरण्याची जी परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे.' 

'पण आता एक परिस्थिती झाली आहे आणि ती गंभीर आहे.. ही परिस्थिती फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात. त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका.. हीच मला या दोघांच्याही विषयाला मार्गी लावू शकते.' 

'या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही. स्वत: आमचे पंतप्रधान सांगतात की, ते प्रधानसेवक आहेत. त्यामुळे या घटनेमुळे कोणीही मोठं नाही. त्यामुळे घटना आणि कायद्या यापेक्षा ना हा समाज मोठा आहे किंवा तो समाज.. त्यामुळे कोणी असा अविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला देखील वाटेल.' 

'कोणीही माघार घेण्याचा विषय नाही. जे संविधानात बसतं तेच होणार. आता एका विशिष्ट वर्गाला न्यूनगंड वाटत असेल तर ते नक्कीच प्रतिक्रिया व्यक्त करतील. त्यावर सरकारने नक्कीच मायबापाची भूमिका घेणं आवश्यक आहे.'

'या सगळ्याचा भाजपला फटका बसण्याचा प्रश्नच नाही.. हा विषय सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यातील आहे. जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे याचा आम्ही अनेकदा पुनर्उच्चार केलाय. आता देखील तेच बोलतोय आम्ही. जेवढे आहेत तेवढे समोर येऊ द्या.' 

'मुंडे साहेब हयात नाहीत. मुंडे साहेबांसोबत मी अनेक सभांमध्ये होते. मुंडे साहेब म्हणायचे की, राजकीय आरक्षणावर बोलायची गरज नाही. कारण सर्व महत्त्वाच्या पदांवर, 288 पैकी 200 आमदार.. 48 पैकी 35-40 खासदार त्यांचे असतील. सगळ्या मार्केट कमिटीचे सभापती, सगळे पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदचे अध्यक्ष.. जिथे आरक्षण नाही तिथे सगळीकडे मराठा समाजाचे असतील तर त्यांना राजकीय आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या बाकीच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. हे मुंडे साहेबांनीही म्हटलंय आणि आम्हीही म्हटलंय.' असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT