Gadchiroli Video : काळजावर वार... दोन्ही मुलांचा एकाच वेळी मृत्यू, आई-वडिलांची मृतदेह खांद्यावर घेतला अन 15 किमी...

मुंबई तक

05 Sep 2024 (अपडेटेड: 05 Sep 2024, 06:49 PM)

Gadchiroli Viral Video : गडचिरोली जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांनी आपल्या दोन लेकरांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट केल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ही घटना घडली आहे. या घटनेचा हृदयद्रावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

gadchiroli viral video father and mother 15 kilo meter walk child deadbody vijay wadettiwar and sanjay raut criticize

.दोन लेकरांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांची 15 किमी पायपीट

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन लेकरांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांची पायपीट

point

आई-वडीलांनी तब्बल 15 किलोमीटर पायपीट

point

आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव दर्शवणारा व्हिडिओ

Gadchiroli Viral Video : गडचिरोली जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आई-वडिलांनी आपल्या दोन लेकरांचे मृतदेह आपल्याच खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट केल्याची घटना घडली आहे. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे ही घटना घडली आहे. या घटनेचा हृदयद्रावर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता या घटनेवरून विरोधकरांनी सरकारवर टीकास्त्र डागायला सुरूवात केली आहे.  (gadchiroli viral video father and mother 15 kilo meter walk child deadbody vijay wadettiwar and sanjay raut criticize) 

हे वाचलं का?

गडचिरोलीतील या हादरवून टाकणाऱ्या घटनेचा व्हिडिओ एक्सवर शेअर करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना घेरलं आहे. ''गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा आहे. आणि हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ आहे. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात,अशी टीका वडेट्टीवार यांनी फडणवीस आणि आत्राम यांच्यावर केली आहे. 

हे ही वाचा : Jaydeep Apte: वकिलाच्या संपर्कात असलेला जयदीप आपटे पोलिसांना का नाही सापडला?.. नेमकं काय घडतंय

वडेट्टीवार ट्विट जशाचं तसं... 

''दोन्ही लेकरांचे ‘मृतदेह’ खांद्यावर घेऊन चिखलातून वाट शोधत पुढे जात असलेले हे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील आहे.''

''आजोळी आलेल्या दोन भावंडांना ताप आला. वेळेत उपचार मिळाले नाही. दोन तासांतच दोघांचीही प्रकृती खालावली व दीड तासांच्या अंतराने दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.''

''रुग्णालयातून मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका नव्हती. आईवडिलांनी दोन्ही भावंडांचे मृतदेह खांद्यावर घेतले. चिखलातून वाट शोधत १५ किलोमीटर दूर अंतरावरचे अहेरी तालुक्यातील पत्तीगाव पायीच गाठले.'' 

''गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले.'' 

''गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा. हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात''.

दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे.

राऊतांचा फडणवीसांवर निशाणा 

 या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अभिमानाने गडचिरोली जिल्ह्याचा कायापालट करू असा दावा केला होता. हा दावा फोल ठरल्याची टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आरोग्यव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यांचा कायापालट करण्यापेक्षा खान उद्योग मायनिंग तिकडे आर्थिक व्यवहार आपल्या हातात असावे यासाठी गडचिरोली जिल्हा स्वतःकडे ठेवला, असा आरोप राऊत यांनी केला. यासाठी वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली. मात्र आजही आदिवासी संघर्ष करत आहे. आरोग्य व्यवस्था नाही. रस्ते नाही शाळा नाही. त्यामुळे आजही आजारी गर्भवती यांना जोळीत टाकून त्यांना प्रवास कसा करावा लागत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 

हे ही वाचा : Shivaji Maharaj Statue: ''जो चूक करतो, तोच माफी मागतो'', पुतळा दुर्घटनेवरून राहुल गांधी PM मोदींवर भडकले

नेमकी घटना काय? 

गडचिरोलीमध्ये आजोळी आलेल्या दोन भावडांना ताप आला होता. अशिक्षित आई वडिलांनी त्यांना दवाखान्यात नेण्याऐवजी पुजाऱ्याकडे नेले होते अन् तेथेच घात झाला. दोन तासात दोघांची प्रकृती खालावली आणि दीड तासाच्या अंतराने दोघांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर आई-वडिलांनी दवाखाना गाठला होता.पण उशीर झाला होता. त्यानंतर त्यांना दवाखान्याकडून मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळणे अपेक्षित होते. मात्र रुग्णवाहिका अभावी आई वडिलांना मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किलोमीटरपर्यंत घरापर्यंत पायपीट करावी लागली होती. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील पत्तीगावात ही घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे भीषण वास्तव दर्शवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

    follow whatsapp