Lok Sabha Election 2024: 'माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज.. ते विसरू शकत नाही', PM मोदी असं का म्हणाले?

मुंबई तक

03 May 2024 (अपडेटेड: 03 May 2024, 02:57 PM)

PM Modi on Balasaheb Thackeray: 'बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही..' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पण त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? याबाबत राजकीय वर्तुळात सध्या बरीच चर्चा सुरू आहे.

'माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज ते विसरू शकत नाही'

'माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज ते विसरू शकत नाही'

follow google news

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुंबई: 'बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही.. अजिबात विसरू शकत नाही.' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. पण मोदींनी नेमकं हे विधान आता का केलं असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. (lok sabha election 2024 why did pm modi say i can never forget balasaheb thackeray debt to me)

हे वाचलं का?

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना अत्यंत आक्रमक पद्धतीने भाजप आणि मोदींविरोधात प्रचार करत आहे. अशावेळी भाजपला फटका बसू नये याची काळजी आता पंतप्रधान मोदी स्वत: घेत आहेत. त्यामुळेच आपले ठाकरेंशी वैयक्तिक वाद नसल्याचं मोदींनी म्हटलंय आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्यावर कर्ज असल्याचं म्हणत मोदींनी आता मतदारांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले...

ज्या कालखंडात त्यांनी सरकार चालवलं.. त्यावेळचं सगळं काम हे भारताच्या राजकीय पक्षाच्या मूलभूत विचारधारा.. जी बाळासाहेबांची होती त्याच्या विपरित केलं आहे. 

औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा बसतोय हा राग महाराष्ट्रातील लोकांमध्ये आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जर कोणी बसत असेल तर लोकांना दिसतं की, बाळासाहेबांनी ते हे म्हटलं होतं.. त्यांच्या मुलांमध्ये सत्तालालसा अशी आलीए? त्यामुळे भावनिक बाजू आमच्या बाजूने आहे आणि राग त्यांच्या बाजूने आहे.

हे ही वाचा>> 'यासाठी' शिंदेंना बनवलं CM, मोदींनी सांगितलं खरं कारण!

दोन गोष्टी आहेत.. ते बायोलॉजिकली त्यांचे पुत्र आहेतच.. त्याबाबत काही विषयच नाही.. जेव्हा उद्धव ठाकरे आजारी होते मी त्यांना तात्काळ फोन केला होता. मी नेहमी वहिनींना (रश्मी ठाकरे) करून उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचो. 

ऑपरेशन करण्याआधी मला फोन केला... मला विचारलं की, तुमचा सल्ला काय? मी म्हटलं की, 'तुम्ही सर्वात आधी ऑपरेशन करून घ्या.. बाकीच्या चिंता सोडून द्या.. शरीराची काळजी घ्या. 

बाळासाहेबांचे पुत्र म्हणून मी त्यांचा मानसन्मान करेनच.. ते माझे शत्रू नाहीत. जर उद्या ते अडचणीत आले तर मी पहिला व्यक्ती असेन की, मी त्यांची मदत करेन. कौटुंबिकदृष्ट्या म्हणतोय मी.. 

पण जिथवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा मुद्दा आहे तर मी त्यासाठीच जगेन.. बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही.. अजिबात विसरू शकत नाही. 

आज जे आम्ही शिवसेनेसोबत बसलो आहोत.. आमच्याकडे आज सर्वात जास्त आमदार आहेत पण तरीही शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.. ही माझी बाळासाहेबांना श्रद्धांजली आहे..

हे ही वाचा>> भाजप-एनडीए किती जागा जिंकेल? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला

आम्ही मागील निवडणुकीत (2014 साली) आमनेसामने लढलो होतो. पण त्या निवडणुकीत मी एक शब्दही बाळासाहेबांच्या विरुद्ध बोललो नव्हतो. मी जाहीररित्या बोललो होतो की, मला उद्धवजी कितीही शिव्या देवोत.. पण नाही बोलणार, कारण माझं बाळासाहेबांवर माझी श्रद्धा आहे. म्हणून त्यांच्या कौटुंबिक काय अडचणी आहेत हा माझा विषय नाही.. 

मी बाळासाहेबांचा आदर करतो आणि मी त्यांचा आयुष्यभर आदर करत राहो.. 

असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं आहे. 

    follow whatsapp