लोकल सुरू, पण मुंबईकर अजूनही बसच्या रांगेत

मुंबई तक

• 10:35 AM • 02 Feb 2021

सोमवारपासून तब्बल 10 महिन्यांनी सामान्यांसाठी मुंबई लोकल धावू लागली. पण याच्या आनंदापेक्षा ठरवून दिलेल्या वेळांबाबतची नाराजीच मुंबईकरांच्या मनात अधिक होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्याची घोषणा झाल्याने पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकल पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्येच सामान्यांसाठी लोकल […]

Mumbaitak
follow google news

सोमवारपासून तब्बल 10 महिन्यांनी सामान्यांसाठी मुंबई लोकल धावू लागली. पण याच्या आनंदापेक्षा ठरवून दिलेल्या वेळांबाबतची नाराजीच मुंबईकरांच्या मनात अधिक होती.

हे वाचलं का?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मुंबई लोकल पुन्हा सुरु करण्याची घोषणा झाल्याने पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकल पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्येच सामान्यांसाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे लोकलच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना लोकलचा फायदा झालाच नसल्याचं, बसच्या रांगांपासून त्यांची सुटका झाली नसल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळालं.

हा व्हिडिओ देखील पहा..

तर मास्क आणि वेळेच्या नियमांचं पालन न केलेल्या अंदाजे 571 प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 200 रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर विनातिकीट प्रवास करणाऱ्या 396 प्रवाशांवर पश्चिम रेल्वेकडून कारवाई करून 1 लाखांच्या वर दंड वसूल करण्यात आला. पहिल्या दिवशी एकूण 7 लाखांहून अधिक प्रवाशांची भर पडलीय.

तिकिटांच्या विक्रीचा विचार केला तर, सोमवारी सायंकाळी 6 पर्यंतची स्थितीनुसार मध्य रेल्वेवर 2 लाख 67 हजार 137 प्रवासी तिकिटांची आणि 42 हजार 582 पासची विक्री झाली. पश्चिम रेल्वेवर 2 लाख 32 हजार 578 तिकिटांची विक्री करण्यात आली. सर्व प्रकारच्या तिकिीटविक्रीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत एका दिवसात 2.09 कोटी रुपयांची भर पडली.

हे देखील व्हिडिओ पहा…

    follow whatsapp