Nana Patole : “जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत त्यांनी काँग्रेसवर बोलू नये”

मुंबई तक

• 10:43 AM • 05 Nov 2022

जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत त्यांनी काँग्रेसवर बोलू नये असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. चंद्रकांत खैरे यांनी आज एक वक्तव्य केलं होतं ज्यात देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे २२ आमदार फोडणार आहेत असं म्हटलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. नेमकं काय […]

Mumbaitak
follow google news

जे स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाहीत त्यांनी काँग्रेसवर बोलू नये असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना लगावला आहे. चंद्रकांत खैरे यांनी आज एक वक्तव्य केलं होतं ज्यात देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे २२ आमदार फोडणार आहेत असं म्हटलं होतं. त्यावर आता नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय म्हणाले आहेत नाना पटोले?

मला मुळात हे कळत नाही की खैरे नावाचे कुणी प्रवक्ते आमच्याकडे नाहीत, मग ते काँग्रेसची भूमिका का मांडत आहेत? सत्तेत राहून जे आपलेच आमदार सांभाळू शकले नाहीत ते दुसऱ्याच्या घरावर दगड कशाला मारत आहेत? त्यामुळे चंद्रकांत खैरे काय म्हणाले यावर मला फार काही बोलण्याची इच्छा नाही. त्यांना आमच्या पक्षाबद्दल बोलण्याचं काहीही कारण नाही. जे आपलं घर सांभाळू शकले नाही त्यांनी आमच्याबाबत बोलायची गरजच नाही. आमच घर बरोबर आहे. आमचे कुठलेही आमदार सोडून जाणार नाहीत. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे चंद्रकांत खैरे यांनी?

देवेंद्र फडणवीस यांना हे माहित आहे की हे सरकार पडणार आहे. सुप्रीम कोर्टात १६ आमदारांना अपात्र ठरवलं जाईल. त्यामुळे आमचे जुने मित्र असलेले देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत. २२ आमदार फोडण्याची त्यांची तयारी आहे. त्यानंतर हे सरकार जाईल आणि फडणवीस मुख्यमंत्रीही होऊ शकतात असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेत जून महिन्यात फूट पाहण्यास मिळाली तशीच फूट आता काँग्रेसमध्येही पाहण्यास मिळणार का? या चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत.

४० आमदारांपैकी पुन्हा कुणीच निवडून येणार नाही

आत्ता जे भाजपसोबत गेलेले आमच्या पक्षातले आमदार आहेत त्या ४० जणांपैकी कुणीही निवडून येणार नाही असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातून उभे राहिले तरीही निवडून येणार नाहीत कारण शिवसेनेशी, बाळासाहेब ठाकरेंशी आणि उद्धव ठाकरेंशी त्यांनी गद्दारी केली आहे असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. जनता यांना यांची जागा दाखवून देईल. छगन भुजबळ पडले, नारायण राणे पडले तर हे कोण आहेत? असाही प्रश्न खैरे यांनी केला.

आता चंद्रकांत खैरे यांनी जो दावा केला तो खोडून काढत नाना पटोले यांनी मात्र त्यांना आमच्या पक्षाबाबत बोलण्याचा अधिकारच काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

    follow whatsapp