ऐकावं ते नवलंच! १८ वर्षांची मुलगी पडली ४६ वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात; आता आहे २ मुलांची आई

मुंबई तक

• 11:23 AM • 05 Feb 2022

कधी कुणावर जीव जडेल सांगता येत नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका २२ वर्षाच्या मुलीने ५० वर्ष वय असलेल्या व्यक्तीशी संसार थाटला आहे. लग्नानंतर दोघं आनंदी असले, तरी सार्वजनिक जीवनात मात्र, त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांच्या वयामध्ये फार मोठं अंतर असल्याने लोकांना ते बापलेक असल्याचा गैरसमज होतोय. दोघांच्या वयामध्ये […]

Mumbaitak
follow google news

कधी कुणावर जीव जडेल सांगता येत नाही. असंच एक प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. एका २२ वर्षाच्या मुलीने ५० वर्ष वय असलेल्या व्यक्तीशी संसार थाटला आहे. लग्नानंतर दोघं आनंदी असले, तरी सार्वजनिक जीवनात मात्र, त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोघांच्या वयामध्ये फार मोठं अंतर असल्याने लोकांना ते बापलेक असल्याचा गैरसमज होतोय.

हे वाचलं का?

दोघांच्या वयामध्ये २८ वर्षांचं अंतर असल्यानं या तरुणीला सातत्याने लोकांच्या मनात निर्माण होणारा गैरसमज दूर करावा लागत आहेत. त्यामुळेच तिला कधी ‘ते माझे वडिल नाहीत, तर पती आहे’, असं वारंवार लोकांना सांगावं लागत आहे.

एलिझा गेआघन-फोर्ब्स असं या तरुणीचं नाव असून, रिक फोर्ब्स असं तिच्या पतीचं नाव आहे. चार वर्षांपूर्वी दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी विवाहही केला. मात्र, दोघांच्या वयात फार मोठं अंतर असल्यानं त्यांच्यावर वाईट टीकाटिप्पणीही केली जाते. हे जोडप अमेरिकेतील मेन शहरात राहतं.

पेट्रोलपंपावर झाली होती पहिली भेट…

मेट्रो डॉट युकेच्या वृत्तानुसार २०१८ मध्ये एका पेट्रोल पंपावर काम करत असताना एलिझा रिकला पहिल्यांदा भेटली होती. त्यावेळी एलिझा १८ वर्षांची होती आणि रिक ४६ वर्षांचा होता. सुरूवातीला रिकने एलिझाला फार प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर एलिझाने फेसबुकवर रिकला शोधले आणि संवाद सुरू केला. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गेल्या वर्षी दोघं विवाहबद्ध झाले. दोघांना आता दोन अपत्य असून, एक मुल १९ महिन्यांचं, तर दुसरं ५ महिन्यांचं आहे. एलिझा सध्या मेडिकल असिस्टंटचा अभ्यास करतेय.

दोघांच्या वयातील अंतराबद्दल एलिजा म्हणते की, ‘पती पत्नीच्या वयात मोठं अंतर असेल, तर लोक नेहमी नकारात्मक पद्धतीने विचार करतात. पती-पत्नीपैकी ज्याचं वय कमी आहे, त्याला लग्नासाठी तयार केलं गेलं असावं, असं लोकांना वाटतं. त्यामुळे त्याच्या पीडित म्हणूनच बघतात.’

    follow whatsapp