अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं मुख्यमंत्र्यांना पत्र; शूटींग सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी

मुंबई तक

• 10:57 AM • 21 Apr 2021

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येतायत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. यामध्ये मालिका तसंच फिल्मच्या शूटींगवर परिणाम झालाय. यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्र्यांने काही मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे […]

Mumbaitak
follow google news

राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येतायत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. यामध्ये मालिका तसंच फिल्मच्या शूटींगवर परिणाम झालाय. यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय.

हे वाचलं का?

या पत्राद्वारे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने मुख्यमंत्र्यांने काही मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे नियम आणि अटींसह शूटींगला परवानगी द्यावी ही मुख्य मागणी करण्यात आलीये.

शूटींग करायचे असेल तर हे नियम पाळावेच लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निर्मात्यांच्या बैठकीत दिले सक्त आदेश

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. त्याअंतर्गत आपण सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला ब्रेक दिलात. खरं तर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता घरातच खिळवून ठेवण्याचे काम आपली मनोरंजन इंडस्ट्री करीत असते.

आपण हीच इंडस्ट्री बंद केलीत. विविध हिंदी चॅनेलने आपली शूटिंग महाराष्ट्राबाहेर हलवली आहे. मनोरंजन इंडस्ट्री आपल्याकडे यावी म्हणून अनेक राज्यांनी रेड कार्पेट अंथरली आहेत. आज लॉकडाऊनचा आधार घेऊन महाराष्ट्राबाहेर शूटिंग व्यवस्थित व योग्य बजेटमध्ये पार पडली जावू लागली तर ही इंडस्ट्री महाराष्ट्राबाहेर जायला वेळ लागणार नाही. या इंडस्ट्रीवर अवलंबून असणारे महाराष्ट्रातील लाखो कलाकार, तंत्रज्ञ, कामगार बेकार होतील. काही हजार कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असणाऱ्या या इंडस्ट्री मधून तसाच मोठा महसूल राज्य सरकारला मिळत असतो.

बॉलिवूड महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे मोठे षडयंत्र असून आपण त्यापासून सावध राहाणे अत्यावश्यक आहे. बॉलिवूड इंडस्ट्री ही महाराष्ट्राची शान आहे. आपल्याला नम्र विनंती की, अधिकाधिक नियम लावून का होईना परंतु शूटिंगला परवानगी द्या. यामध्ये आम्ही पुढील प्रमाणे खबरदारी घेऊन शूटिंग पार पाडू.

१- अतिशय कमी युनिटमध्ये शूटिंग करणे.

२- बांधकाम क्षेत्राच्या धरतीवर ज्या ठिकाणी शूटिंग आहे त्याच ठिकाणी जास्तीत जास्त लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करु.

३- सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स यांचा अवलंब करून काटेकोर अंमलबजावणी करु.

४- कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांना कोविड टेस्ट कम्पलसरी करु.

५- सेटवर डॉक्टरांची उपलब्धता करून देऊ.

६- खाण्यापिण्यासाठी पर्यावरण पूरक अशा वस्तूंचा वापर करू.

७- काळजी घेऊनही कोणी पॉझिटिव्ह आलं तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवू किंवा होम क्वारंटाईन करु.

८- खाण्यापिण्याचं साहित्य बाहेरुन आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करु. त्यामुळे एकमेकांशी कमीत कमी संपर्क होईल.

९- सर्व टीमची ऑक्सिजन पातळी आणि तापमान याची रोज नोंद घेऊन रजिस्टर मेंटेन करु.

१०- सार्वजनिक ठिकाणी शूटिंग टाळण्यात येईल.

कृपया आपण आमच्या मागणीचा गांभीर्याने व सकारात्मक विचार करुन चित्रीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी ही विनंती.

    follow whatsapp