लोकसभेतील मविआच्या विजयानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्मारकाचं लोकार्पण राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. त्यांच्यासोबत मंचावर शरद पवार उपस्थित होते आणि इतर आघाडीतील नेते देखील उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी मराठीतून भाषण केलं. त्याच बरोबर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी देखील भाषणं केली. विशेष म्हणजे, विशाल पाटील यांच्या भाषणादरम्यान एक शेतकरी थेट मंचावर आला आणि राहुल गांधींना भेटला. हे प्रकरण सर्व उपस्थितांसाठी आश्चर्यकारक ठरलं.