Anil Deshmukh: "वा... देवेंद्र फडणवीस जी! तुम्ही 15 दिवस का शांत होता?"

योगेश पांडे

11 Aug 2024 (अपडेटेड: 11 Aug 2024, 04:17 PM)

Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन वाझे, परमबीर सिंग पोपटासारखे बोलतायत अशी टीका केली.त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होतात? असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे.

anil deshmukh reply devendra fadnavis and parambeer singh on new allegation maharashtra politics

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीसांच्या सांगण्यावरून वाझे, परमबीर सिंग पोपटासारखे बोलतात

point

परमबीर सिंग भाजपाला शरण गेला

point

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगितण्यावरून आरोप करतात

Anil Deshmukh Reply Devendra Fadnavis : राज्यातील आजी माजी गृहमंत्र्यांमला वाद शमता शमत नाही. रोज नवीन ट्विस्ट आणि आरोपांचा बॉम्ब हा फुटतच असतो. अशात शनिवारी परमबीर सिंह यांनी आरोपांचा नवीव बॉम्ब फोडला होता. यामध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी बैठका व्हायच्या. या बैठकीत फडणवीसांसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक करण्याचा प्लॅन होता,असा आरोप करून परमबीर सिहांनी (Parambeer Singh) खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ''मला अटक करण्या संदर्भात आणि भाजप नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलेले आहे ते पूर्णपणे सत्य'' असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर आता अनिल देशमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होतात? आणि आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय ? असा सवाल देशमुखांनी केला आहे. (anil deshmukh reply devendra fadnavis and parambeer singh on new allegation maharashtra politics) 

हे वाचलं का?

अनिल देशमुख यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन वाझे, परमबीर सिंग पोपटासारखे बोलतायत अशी टीका केली.त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होतात? असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन

देशमुखांचं ट्विट जशाचं तसं...

वा... देवेंद्र फडणवीस जी!

मी 15 दिवसापुर्वी, तुम्ही 3 वर्षापुर्वी कसे श्री.उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे जो देशद्रोहाच्या व 2 खुनाच्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापासुन जेलमध्ये आहे, तसेच परमबीर सिंगने 3 वर्षापुर्वी उद्योगपती श्री.मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कार्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कार्पिओ गाडीच्या मालकाची हत्या करणे, या दोन्ही गुन्हाचा सुत्रधार आहे. अशा आरोपी परमबीर सिंग याला पुढे केले आहे. 

आता दोघेही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन पोपटा सारखे बोलत आहे. वरील दोन्ही प्रकरणाचा मुळे सुत्रधार परमबीर असल्यामुळे आम्ही त्याला 3 वर्षापुर्वी निलंबीत केले. त्याला 3 वर्षापुर्वी केंद्रीय एजंन्सीकडून अटक होणार होती. पण तो भाजपाला शरण गेला आणि आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करीत आहे.

देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होता आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय ?

 

देशमुखांनी फडणवीसांवर उपस्थित केलेल्या सवालावर आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी एक्सवर ट्विट करून उत्तर दिले आहे. 

सचिन वाझेला सेवेत घेणारे तुम्हीच...
परमवीरसिंग यांना पोलिस आयुक्त करणारेही तुम्हीच...
केवळ तुमची वसुलीची, राजकीय कटकारस्थानाची लफडी त्यांनी बाहेर काढली म्हणून आता तुम्ही अंग का झटकताय ?
पोपट तर तुमचा झालाय अनिलबाबू ...
बोलताही येत नाही आणि गप्पही राहता येत नाही.
या सर्वांचे व्हिडिओ पुरावे आहेतच.
तुमच्या प्रवीण चव्हाणने तर हा कट ऑन-कॅमेरा सांगितला! 
त्याचीही सीबीआय चौकशी सुरूच आहे.

बात निकली है तो बहुत दूर तक जाएगी,
आगे आगे देखिए होता है क्या !
'वाझे काय लादेन आहे काय?' हे ऐतिहासिक वाक्य विसरू नका.
(आणि हो माहितीसाठी: उद्धव ठाकरेंनी कितीही दबाव आणला तरी वाझेला सेवेत परत घेण्याच्या फाईलवर सही करण्यास त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला होता, याचेही स्मरण तुम्हाला होत असेलच)  

फडणवीस काय म्हणाले? 

मी एवढं सांगेन की त्यांनी मला अटक करण्या संदर्भात आणि भाजप नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलेले आहे ते पूर्णपणे सत्य आहे, याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी एकच इन्सिडेंट सांगितला असे चार इन्सिडेंट आहे, ज्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याच षडयंत्र झालx परंतु हे सगळे षड्यंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करून चुकलो आणि व्हिडिओ पुरावे आम्ही सीबीआयला दिले, आजही आमच्याकडे अनेक व्हिडिओ पुरावे त्याचे आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Mahadev Jankar : विधानसभेआधी महायुतीला झटका? जानकरांचा शिंदे-फडणवीसांचा इशारा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी असेन,गिरीश महाजन असेल,प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते असे ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती. काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते  करू शकले नाही कारण अनेक चांगले अधिकारी होते ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.  

दरम्यान आता परमबीर सिंह यांच्या या आरोपावर आता महाविकास आघाडीचे नेके काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

परमबीर सिंहांच्या आरोपांचा नवीन बॉम्ब 

परमबीर सिंह यांनी एनआयला प्रतिक्रिया दिली आहे. ''ठाण्यातील एका जमीन प्रकरणात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यात मलाही गोवण्याचा प्रयत्न झाला'', असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. ''ऐवढेच नाही तर या प्रकरणी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेचेही आदेश देण्यात आले होते. हे सर्व संजय पांडे यांच्या मार्फत सुरू होते. आणि त्यांना डायरेक्ट आदेश अनिल देशमुख, शरद पवार आणि तत्काली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळत होते, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात माझ्याकडे व्हिडिओ पुरावे देखील आहे, आणि वेळ आल्यावर ते सादर देखील करेन'', असे सिंह यांनी सांगितले. 

परमबीर सिंह पुढे म्हणाले, ''अनिल गोटे नावाचे माजी आमदार आहेत, चव्हाण नावाच्या सरकारी वकिलासह मुंबईत आले होते. त्यांची अनिल देशमुखांसोबत मी मिटींग झाली होती. या मिटींगला मलाही बोलवण्यात आले होते. त्यावेळेस माझ्यावर गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांनाही अटक करण्यासाठी आपल्यावर दाबव टाकला होता असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर पुन्हा सिल्व्हर ओकवर एक बैठक बोलावली होती या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते. त्यावेळेस देखील माझ्यावर गिरीष महाजन आणि जयकुमार रावल यांच्या अटकेसाठी दबाव टाकला होता'', अशा खळबळजनक दावा परमबीर सिंह यांनी केला. 

''उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी सुद्धा एक बैठक झाली होती. या बैठकीला अनिल देशमुख उपस्थित होते. त्यावेळेस प्रविण दशिवाय मुंबई बँकेचे संचालक प्रविण दरेकर यांच्या विरोधातही कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र असे करण्यास आपण नकार दिली होता,'' असेही ते म्हणाले.

    follow whatsapp