Badlapur : 'DCP चा फोन आला, FIR बदललं...ते प्रकरण दाबण्यासाठी...' कुटुंबीयांनी सांगितली Inside Story

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

badlapur rape case upate school administration and police try to hide these case exclusive news read full article
शाळेपासून ते पोलीसांपर्यंत सगळ्यांनीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली

point

पोलिसांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही

point

पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली खंत

Badlapur News Case Update Exclusive : बदलापूरमधील चिमुरडींवर (Badlapue Assualt Case) झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दाबण्यासाठी अनेक प्रयत्न झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. शाळेपासून ते पोलीसांपर्यंत सगळ्यांनीच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा दावा पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे नेमकं शाळा प्रशासनाने (School Administration) आणि पोलिसांनी (Police) हे  प्रकरण दाबण्यासाठी काय काय केलं? यामागची इनसाईड स्टोरी पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितली आहे. (badlapur rape case upate school administration and police try to hide these case exclusive news read full article)   

आजतक, इंडिया टुडेने बदलापूर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांशी बातचीत केली आहे. यावेळी पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या घटनेनंतर ''आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा वाटत नाही'',अशी खंत शेवटी पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

शाळा प्रशासनाचा अजब दावा

चिमुरडींचे वैद्यकीय अहवाल हाती आल्यानंतर त्यात अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी घटनेचा जाब विचारण्यासाठी शाळा गाठली होती. मात्र आमच्या शाळेत ही घटना घडूच शकत नाही, असे म्हणत शाळा प्रशासनाने घटनेस नकार दिला. तसेच ही घटना शाळेत नसून शाळेबाहेर घडल्याचे सांगितले किंवा सायकल चालवताना घडले असल्याचाही दावा केला होता. पण पीडितेच्या कुटुंबीयांनी यावेळी आमच्याकडे वैद्यकीय अहवाल आहे आणि सायकल चालवताना असे घडू शकत नाही, असे म्हणत शाळा प्रशासनाचा दावा फेटाळून लावला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Badlapur School Case: 'हे सगळं...', आरोपी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचा खळबळजनक आरोप

शाळेच्या सीसीटीव्हीत बिघाड 

दरम्यान पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्हीची मागणी देखील केली होती. मात्र शाळा प्रशासनाने सीसीटीव्हीचे कामकाज सूरू असल्याने ते 15 दिवसांपासून बंद असल्याचे कारण दिल्याचे पीडितेचे कुटूंबीय म्हणाले. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांनी शाळा प्रशासनाकडे पुरूष स्टाफ का ठेवला? याचा जाब देखील विचारला होता. त्यामुळे अशा प्रकारची माहिती देऊन शाळा प्रशासनाने प्रकरण दाबल्याचा आरोप करत 
मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांवरही कारवाईची मागणी केली आहे.

12 तासानंतर तक्रार दाखल 

शाळा प्रशासनाच्या या भुमिकेनंतर आम्ही थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. तसेच आमच्याकडे वैद्यकीय अहवाल असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी आमचा वैद्यकीय अहवालही पाहिला नाही, याउलट आम्हाला ताटकळत बसून ठेवले. तसेच आमचे अजिबात एकून घेतले नाही, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला.

ADVERTISEMENT

पोलिस आमचे ऐकत नसल्याने आम्ही मनसेच्या स्थानिक नेत्यांना बोलावून त्यांची मदत मागितली. मनसेचे नेते पोलीस ठाण्यात आले, मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही. नंतर मनसेच्या लोकांनी वरिष्ठ पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर एक वरिष्ठ पोलीस ठाण्यात आला. त्यानंतर तब्बल 12 तासांनंतर आमची एफआयआर दाखल करून घेण्यात आली. मात्र त्या एफआयआरमध्ये आम्ही जे सांगितले होते, त्यात पोलिसांनी अनेक बदल केले होते, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर केला.

ADVERTISEMENT

पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावले

बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आम्हाला धमकी दिल्याचा आरोपही पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. जेव्हा बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू होते, तेव्हा आम्हाला तुम्ही या आंदोलनात दिसता कामा नये. जर आंदोलनात दिसल्यास कठोरात कठोर कारवाई केली जाईल. तसेच बदलापूरातील आंदोलन भडकावल्याच्या नावाखाली आमच्यावर गुन्हा दाखल करू, अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला.

हे ही वाचा :MPSC Exam 2024: विद्यार्थ्यांसमोर सरकार झुकलं, MPSC परीक्षेबाबत मोठा निर्णय

पोलिसांनी 'ती' गोष्ट लेखी लिहून घेतली

आंदोलनाच्या दिवशी आम्हाला, वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की ते डीसीपी आहेत. डीसीपीने आम्हाला सांगितले की, आंदोलकांना हटवण्यासाठी 200 हून अधिक पोलिसांचा ताफा मागवण्यात आला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन नको, असे लिहून द्या, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पेपरमध्ये लिहायचे आहे की आम्हाला हे आंदोलन नको आहे आणि आम्ही कोणालाही येथे आंदोलन करण्यासाठी बोलावले नाही. आम्ही पोलिसांना सांगितले की लोक काय करत आहेत ते स्वतः करत आहेत, आम्ही त्यांना बोलावले नाही. आम्ही लेखी देणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.

दरम्यानच्या या संपूर्ण काळात आम्हाला शिवीगाळ केली गेली, धमक्या दिल्या, महिला अधिकारी तासनतास बेपत्ता होती. आमच्यासोबत ज्या काही घटना घडल्या आहेत, त्यामुळे आम्ही पोलिसांवरील विश्वासार्हता गमावली आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांकडून न्याय मिळेल की नाही असे वाटत नाही, अशी खंत देखील पीडितेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT