Devendra Fadnavis: 'मी एक मिनिटंही शांत बसलो नव्हतो..', शाहांची भेट अन् फडणवीसांचं मोठं विधान..

मुंबई तक

ADVERTISEMENT

अमित शाहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान..
अमित शाहांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान..
social share
google news

BJP Maharashtra: मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्याला सरकारमधून मोकळं करावं असं म्हटलं होतं. त्यानंतर काल (7 जून) अमित शाहांशी झालेल्या भेटीनंतर फडणवीसांनी दिल्लीत नेमकं काय घडलं ते जाहीरपणे सांगितलं. (devendra fadnavis big statement after amit shah meeting i didnt sit still even for a minute)

मुंबईत आज भाजपच्या सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस असं म्हणाले की, 'अमित शाहांनी मला सांगितलं की, आता हे सगळं काम चालू द्या. मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायचीय महाराष्ट्राची.. ती तयार करू.. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत.. याही किंवा त्याही.. कुठल्याही परिस्थितीत.. मी एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीए..' 

हे ही वाचा>> देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं, 'सहानुभूती होती तर...'

देवेंद्र फडणवीसांचं भाषण जसंच्या तसं...  

'हे खरं आहे की, एकीकडे देशामध्ये लोकांनी पुन्हा एनडीए आणि मोदीजींवर विश्वास दाखवला. त्याचवेळी आपल्या मनात ही सल देखील आहे की, मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा 2014 आणि 2019 मध्ये आपला होता. यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही..' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला व्यूहरचना तयार करता यावी या दृष्टीने आजची बैठक महत्त्वाची आहे. त्यासोबत आपण सगळ्यांनी हा निर्धार केलाय की, महाराष्ट्रात जे काही अपेक्षित यश आलेलं नाही त्याची कारणं त्याठिकाणी शोधून ती दूर कशी करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा जो निर्धार व्यक्त केला त्यासाठी मी आपले आभार मानतोय.' 

'खरं म्हणजे उन्हाळा संपतोय, काहिली पण संपतोय.. पावसाळा जवळ आलाय. पाऊस पडत असताना जे पेरलं जातं ते सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तेच उगवत असतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ याठिकाणी आली आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'या' 5 नेत्यांपैकी कोण होऊ शकतो उपमुख्यमंत्री?, पण...

'तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला. मी तुमचा आभारी आहे. मी एकच गोष्ट आपल्याला सांगतो. यशाचे बाप अनेक असतात. पण अपयशातही.. अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं.. नवीन निर्धार करायचा असतो.' 

ADVERTISEMENT

'या निवडणुकीमध्ये भाजपचं नेतृत्व करत असल्यामुळे मी हे सांगितलं की, हो.. या अपयशाची जबाबदारी माझी आहे.. कारण पक्षाने.. मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन.. बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं.' 

'केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आम्ही कुठे तरी कमी पडलो.. त्याचवेळी मी हे जेव्हा सांगितलं की, मला मोकळं करून काम करायची संधी द्या त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. हा लढणारा व्यक्ती आहे.' 

'चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले जिंकणारे छत्रपती शिवराय.. हे आमची प्रेरणा आहेत.'

'त्यामुळे कोणाला असं वाटलं असेल की, मी निराश झालो.. भावनेच्या भरात बोललो.. तर ते सत्य नाही.. माझ्या डोक्यात काही रणनिती होती.. आजही आहे.. आता आपण सगळ्यांनी विश्वास दाखवलाय..' 

'मी अमित शाह यांना भेटून आलो.. त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. आता त्यांची भूमिका ही काही तुमच्यापेक्षा फार काही वेगळी नव्हती. पण त्यांनी मला सांगितलं की, आता हे सगळं काम चालू द्या. मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायचीय महाराष्ट्राची.. ती तयार करू.. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत.. याही किंवा त्याही.. कुठल्याही परिस्थितीत.. मी एक मिनिटं देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीए..' असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT