West Bengal exit poll : ममता बॅनर्जीना बसणार जबर धक्का! बंगालमध्ये 'खेला होबे'

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक 2024 च्या मैदानात ममता बॅनर्जी यांचाच खेला होबे होताना दिसतोय.

point

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी भाजपला 26 ते 31 जागा मिळताना दिसत आहेत.

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा 'खेला होबे'चा नारा खूप प्रसिद्ध आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 च्या मैदानात ममता बॅनर्जी यांचाच खेला होबे होताना दिसतोय. शनिवारी (1 जून) जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी भाजपला 26 ते 31 जागा मिळताना दिसत आहेत. त्याच वेळी, तृणमूल काँग्रेस 11 ते 14 जागांवर आणि इंडिया ब्लॉक फक्त 2 जागांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. (lok sabha election 2024 west bengal exit poll 2024 mamata banerjee will get a big shock in bengal )

जर व्होट शेअरबद्दल बोलायचं झालं तर, तृणमूल काँग्रेसला 40 टक्के, भाजपला 46 टक्के, इंडिया ब्लॉकला 12 टक्के आणि इतर पक्षांना 2 टक्के मत मिळत आहे. अशा स्थितीत एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपला 46 टक्क्यांच्या आसपास मताधिक्य मिळत असेल आणि त्यांच्या जागा एवढ्या वाढत असतील, तर तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण बंगालमध्ये भाजप चांगलीच मुसंडी मारेल. कारण दक्षिणेत कोणताही धक्का न लावता पश्चिम बंगालमध्ये भाजपला एवढा मोठा विजय मिळणे अशक्य आहे.

हेही वाचा : Exit Poll मध्ये शरद पवारांचा 'आकडा' ठरला खरा!

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यांतर्गत, 1 जून रोजी मतदान झालेल्या सर्व 9 जागा तृणमूल काँग्रेसने 2019 मध्ये आणि मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. अशा स्थितीत एक्झिट पोलनुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, या 9 जागांवर भाजप तळ ठोकू शकते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जर परिस्थिती चांगली राहिली तर पश्चिम बंगालमधून भाजपला 29 जागा मिळतील असा अंदाज आहे. बंगालमधील भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, बंगालमध्ये 1 जून रोजी ज्या नऊ जागांवर मतदान झाले, त्यापैकी तीन जागांवर भाजप आघाडीवर आहे. बारासात, उत्तर कोलकाता आणि मथुरापूर या जागांवर भाजप बाजी मारू शकते.

अशावेळी 2019 मधील परिस्थिती पाहायची झाली तर, बारासात लोकसभा जागेवर विजयाचे अंतर सुमारे 1.10 लाख मतांचे होते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हा फरक फार मोठा मानला जात नाही. त्याच वेळी, उत्तर कोलकातामध्ये मतांमधला फरक सुमारे 1.27 लाख मतांचा होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : 'इंडिया'ला मोठा दणका, एनडीए जाणार 400 पार?, एक्झिट पोलचे आकडे काय?

तर, मथुरापूर लोकसभा जागेवर विजयाचे अंतर सुमारे दोन लाख मतांचे असले तरी भाजपला या तीन जागांवर कमी मतांच्या फरकाने का होईना पण, विजय मिळेल असे वाटते. पण या संपूर्ण निवडणुकीत पश्चिम बंगालमधील संदेशखाली हा सर्वात मोठा मुद्दा होता. मात्र भाजपने जिंकलेल्या जागांमध्ये बशीरहाट जागेचे नाव नाही. याच लोकसभा मतदारसंघात संदेशखाली येतो.

ADVERTISEMENT

बशीरहाटच्या सात विधानसभा जागांपैकी संदेशखाली विधानसभेत भाजपला आघाडी मिळाली तरी, उर्वरित सहा विधानसभा जागांवर आघाडी मिळणे अवघड आहे. याचे एक कारण म्हणजे मुस्लिमबहुल जागा आणि दुसरे कारण म्हणजे गेल्या वेळेसच्या मतांमधला फरक, जो साडेतीन लाखांच्या आसपास होता.

तसंच, संदेशखालीचा मुद्दा बशीरहाटमध्ये तितकासा यशस्वी होणार नसला तरी आसपासच्या जागांवर, विशेषत: उत्तर कोलकाता आणि बारासातवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे भाजपला वाटते.

हेही वाचा : India Today- Axis My India Exit Poll: ठाकरे-शिंदेंची उडणार झोप! खळबळ उडवणारा पोल

 

गेल्या दीड महिन्यातील पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारावर नजर टाकली, तर हे स्पष्ट होते की, बहुतांश निवडणूक प्रचार ध्रुवीकरण आणि तुष्टीकरणाच्या मुद्द्यावरच करण्यात आला होता, ज्याचा परिणाम यावेळी पश्चिम बंगालच्या राजकारणावर होताना दिसतो. ममता बॅनर्जी यांची मुख्य व्होट बँक मुस्लिम व्होट बँक राहिलेली आहे, जी सुमारे 27-30 टक्के आहे. मात्र यावेळी उर्वरित 70 टक्के मते संघटित होऊन भाजपकडे जाताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा पश्चिम बंगालमधील जोरदार निवडणूक प्रचार हे त्याचे प्रमुख कारण असू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जवळपास 22 रॅली घेतल्या, ज्यात उत्तर कोलकाता येथे झालेल्या रोड शोचा समावेश आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही पश्चिम बंगालमध्ये जवळपास 16 सभा घेतल्या.

जर एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपला एवढ्या जागा आणि एवढे मताधिक्य मिळत असेल तर त्याचे प्रमुख कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. जर टीएमसीला इतक्या कमी जागा मिळत असतील तर त्याची अनेक कारणे असतील. पहिले कारण म्हणजे गेल्या 13 वर्षांपासून बंगालमध्ये सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधातही सत्ताविरोधी एक घटक कार्यरत आहे. तसेच यावेळी तृणमूल काँग्रेसवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि संदेशखालीचा मुद्दाही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT