मुंबई: 2025 या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 29 मार्च रोजी घडले आणि या खगोलीय घटनेने ज्योतिषीय दृष्टिकोनातून अनेक राशींवर प्रभाव टाकला. हे सूर्यग्रहण भारतात दृश्यमान नसले तरी, ज्योतिषशास्त्रानुसार त्याचा परिणाम सर्व राशींवर कमी-अधिक प्रमाणात जाणवतो. विशेषतः काही राशींसाठी हे सूर्यग्रहण अडचणी घेऊन आले आहे. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, ग्रहांच्या संयोगामुळे या काळात आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.
ADVERTISEMENT
मेष राशी: आरोग्य आणि करिअरमध्ये अडथळे
मेष राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण कठीण ठरले आहे. ज्योतिषांच्या मते, सूर्यग्रहणाच्या दिवशी शनिचे मीन राशीत संक्रमण झाले, ज्याचा प्रभाव मेष राशीवर पडला आहे. या काळात मेष राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. बेफिकीर राहिल्यास किरकोळ आजारांचा त्रास होऊ शकतो, करिअरमध्येही चढ-उतार दिसून येऊ शकतात. कामात अडथळे किंवा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात संयम ठेवून निर्णय घ्यावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा>>Astrology: कोणत्या वाराला कोणत्या रंगाचे कपडे घालावे? ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या टिप्स
कर्क राशी: आर्थिक नुकसान आणि कौटुंबिक वाद
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणानंतरचा काळ तणावपूर्ण असू शकतो. या राशीवर सूर्य आणि शनिच्या संयोगाचा विपरीत परिणाम होईल. खर्चात वाढ होऊन आर्थिक स्थितीवर ताण येऊ शकतो, कुटुंबातही किरकोळ वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात गुंतवणूक किंवा मोठे आर्थिक निर्णय टाळावेत, अन्यथा नुकसान होऊ शकते. कर्क राशीच्या व्यक्तींनी संयम आणि समजूतदारपणा दाखवून परिस्थिती हाताळावी.
तूळ राशी: नोकरी आणि नातेसंबंधात संकट
तूळ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण करिअर आणि वैयक्तिक जीवनात अडचणी घेऊन आले आहे. नोकरीत चुकीमुळे त्रास होऊ शकतो. कामात काळजी घ्या, नाहीतर बॉस किंवा सहकाऱ्यांशी मतभेद वाढतील, वैवाहिक जीवनातही गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी या काळात आपल्या बजेटवर नियंत्रण ठेवावे आणि बोलण्यात संयम राखावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Vastu Tips: घरात कोणती झाडं मानली जातात अशुभ? 'ही' झाडं लावाल तर...
वृश्चिक राशी: बोलण्यावर नियंत्रणाची गरज
वृश्चिक राशीच्या लोकांना सूर्यग्रहणानंतर आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. या काळात वादविवाद टाळा. तुमच्या बोलण्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. या राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असंही सुचवण्यात आलं आहे.
मीन राशी: शनिच्या प्रभावामुळे त्रास
शनिचे मीन राशीत संक्रमण आणि सूर्यग्रहणाचा संयोग या राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरला आहे. या काळात आर्थिक अडचणी आणि कामात विलंब होऊ शकतो. तब्येतीकडेही दुर्लक्ष करू नका. मीन राशीच्या व्यक्तींना या काळात धीर धरावा आणि अनावश्यक खर्च टाळावा, असा सल्ला आहे.
ज्योतिषीय उपाय
या राशींना अडचणींवर मात करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, सूर्यदेवाला अर्घ्य देणे, शनिदेवाची पूजा करणे आणि हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरू शकते. या उपायांनी ग्रहांचा विपरीत प्रभाव कमी होऊ शकते.
29 मार्च 2025 च्या सूर्यग्रहणाने मेष, कर्क, तूळ, वृश्चिक आणि मीन राशींवर विपरीत प्रभाव टाकला आहे. या राशीच्या लोकांनी सावध राहून योग्य उपायांचा अवलंब केल्यास अडचणी कमी होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीनुसार बदलू शकतो, त्यामुळे वैयक्तिक सल्ल्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. सूर्यग्रहणाचा हा काळ संयम आणि सावधगिरीने पार पाडणे महत्त्वाचे आहे.
ADVERTISEMENT
