Odisha Train Accident : …तर 288 जण वाचले असते, 3 महिन्यांपूर्वी काय घडलेलं?

मुंबई तक

06 Jun 2023 (अपडेटेड: 06 Jun 2023, 06:59 AM)

सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मोठे अपघात कसे घडू शकतात, हे या अधिकाऱ्याने रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले होते.

odisha train accident : The drawback that Railway officer Harishankar talked about. It was linked to tampering with the location box by bypassing the system meant for interlocking.

odisha train accident : The drawback that Railway officer Harishankar talked about. It was linked to tampering with the location box by bypassing the system meant for interlocking.

follow google news

Odisha train accident reason in marathi : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघाताने सगळेच हादरले. यामध्ये आतापर्यंत 288 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तपास अहवाल आल्यानंतरच या अपघातामागील नेमकं कारण स्पष्ट होईल, मात्र सध्या रेल्वेच्या एका अधिकाऱ्याचे पत्र समोर आले आहे. या पत्रात अपघाताच्या सुमारे 3 महिन्यांपूर्वी रेल्वे अधिकाऱ्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली होती. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मोठे अपघात कसे घडू शकतात, हे या अधिकाऱ्याने रेल्वेच्या निदर्शनास आणून दिले होते. (Railway officer had given a warning 3 months ago, expressed apprehension of a major accident)

हे वाचलं का?

हरिशंकर वर्मा यांनी रेल्वे बोर्डाला हे पत्र लिहिले होते. ते उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे सेवेत आहेत. ते तीन वर्षांपासून दक्षिण पश्चिम रेल्वेत कार्यरत आहेत. तेव्हा ते प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर होते. त्यांच्या पोस्टिंगच्या काळात दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये चुकीच्या मार्गावर ट्रेन गेल्याची प्रकरणे समोर आली होती.

दोषींवर कठोर कारवाई करावी

रेल्वे अधिकारी हरिशंकर यांनी असलेल्या त्रुटींकडे लक्ष वेधले होते. इंटरलॉकिंगसाठी असलेल्या सिस्टमला बायपास करून लोकेशन बॉक्सशी छेडछाड करण्याशी त्याचा संबंध होता. हे तात्काळ थांबवलं जावं असं त्यांनी पत्रातून रेल्वे बोर्डाला सांगितले होते.

हेही वाचा >> भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून ठिणगी, शिंदेंच्या मंत्र्यांने दिला इशारा!

त्यावेळी घडलेल्या घटनेचा संदर्भ देत जे काही घडले, त्याकडे गांभीर्याने पाहावे, असे पत्रात त्यांनी लिहिले होते. यामध्ये जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावरही कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली होती, मात्र पत्र देऊनही कारवाई झाली नाही.

रेल्वे अधिकाऱ्यांने काय दिला होता इशारा

हरिशंकर यांनी पत्रात म्हटलेलं होतं की, सिस्टीममध्ये गंभीर उणीवा आहेत. गाडी सुरू झाल्यानंतर गाडी ज्या मार्गावरून रवाना होते, तो मार्गच बदलतो. सिग्नलशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे काम हे कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे आहे, त्यामुळे धोका होण्याची शक्यताही जास्त असते, असेही ते म्हणाले होते.

अपघात कसा झाला?

रेल्वेकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १२४८१ कोरोमंडल एक्सप्रेस बहंगा बाजार स्टेशनच्या (शालिमार-मद्रास) मुख्य मार्गावरून जात होती, त्याचवेळी ती रुळावरून घसरली आणि अप लूप मार्गावर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ट्रेन पूर्ण वेगाने धावत होती, त्यामुळे 21 डबे रुळावरून घसरले आणि 3 डबे दुसऱ्या रुळावर गेले.

हेही वाचा >> विनोद तावडे म्हणाले भाजपमध्ये परत या, एकनाथ खडसेंनी केलं मोठं विधान

वास्तविक, बहनगा बाजार स्थानकावर या गाड्यांना थांबा नाही. अशा वेळी दोन्ही गाड्यांचा वेग खूप होता. बहनगा बाजार स्थानकावरून जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस अचानक रुळावरून घसरल्याने मालगाडीला धडकले. दरम्यान, अपघाताच्या वेळी डाऊन मार्गावरून जाणाऱ्या यशवंतपूर-हावडा एक्स्प्रेसचे मागचे दोन डबेही रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसला धडकले. भुवनेश्वर रेल्वे स्थानकापासून सुमारे 171 किमी आणि खरगपूर रेल्वे स्थानकापासून सुमारे 166 किमी अंतरावर बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्थानकावर हा अपघात झाला.

    follow whatsapp