SSC And HSC Result 2025 : दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट

Maharashtra SSC HSC Result 2025 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांपूर्वी पार पडल्या.

SSC And HSC Result 2025 Date

SSC And HSC Result 2025 Date

मुंबई तक

16 Apr 2025 (अपडेटेड: 16 Apr 2025, 06:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोणत्या तारखेला दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर होणार?

point

या वेबसाईटवर दहावी आणि बारावीचा निकाल पाहू शकता

point

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती?

Maharashtra SSC HSC Result 2025 Date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा काही दिवसांपूर्वी पार पडल्या. विद्यार्थी आता सुट्टीचा आनंद लुटत असले, तरी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. पेपर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून शिक्षण विभागाकडून पुढच्या महिन्यात दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

हे वाचलं का?

या वेबसाईटवर दहावी आणि बारावीचा निकाल पाहू शकता

जे विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत, ते महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर अर्ज करू शकतात. दरम्यान, शिक्षण मंडळाकडून निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, 15 मे पर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

हे ही वाचा >> 22 वर्षीय तरुणीला घेऊन गेला OYO वर, गर्लफ्रेंड जोरजोरात ओरडत बाहेर पळाली! 38 वर्षांचा उमेश बाथरुममध्ये अन्...

परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी या लिंकवर जाऊन महाराष्ट्र HSC SSC 2025 चा निकाल चेक करू शकतात. गतवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आणि एसएससीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात घोषित केला होता. यावर्षई बारावीच्या परीक्षेला 15 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 8,10,348 मुले, 6,94,652 मुली आणि 37 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

हे ही वाचा >> कुत्रा चावला म्हणूनही चर्चेत आले, हे संभाजी भिडे नेमके आहेत तरी कोण?

याशिवाय दहावीच्या परीक्षेत 16,11,610 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 8,64,120 मुले, 7,47,471 मुली आणि 19 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मंत्री आशिष शेलार यांनी MSBSHSE आणि आयटी विभागासोबत नुकतीच बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, लाखो विद्यार्थी जेव्हा बोर्डाच्या वेबसाईटवर लॉग इन करतात, तेव्हा वेबसाईटवर लोड येतो. यामुळे तांत्रिक अडचणी आणि ओव्हरलोडची स्थिती निर्माण होते. त्यांनी अधिकाऱ्यांना वेबसाईटची क्षमता वाढवण्यासाठी आणि सायबर सुरक्षेबाबत उपाययोजना राबवण्यासाठी निर्देश दिले. 

    follow whatsapp