Pitru Paksha 2024 : नोकरी व्यवसायात समस्या, आर्थिक संकटही येणार; 'या' राशींसाठी पितृ पक्ष कसा असणार?

मुंबई तक

19 Sep 2024 (अपडेटेड: 19 Sep 2024, 10:41 PM)

Pitru Paksha 2024 : मंगळवारी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाची सुरूवात झाली आहे. आणि येत्या 2 ऑक्टोबरला पितृ पक्षाची समाप्ती होणार आहे. या काळात पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध वगैरे केले जातात. पितृ पक्षात ग्रहण लागल्यामुळे काही राशींवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे?

pitru paksh 2024 on these zodiac signs period face proble career and money

या राशींसाठी पितृ पक्षाचा काळ अडचणीचा

follow google news

बातम्या हायलाइट

point

या राशींसाठी पितृ पक्षाचा काळ अडचणीचा

point

नोकरी,व्यवसायात अनेक समस्या येणार

point

आर्थिक संकटाचाही सामना करावा लागणार

Pitru Paksha 2024 : मंगळवारी 17 सप्टेंबरपासून पितृ पक्षाची सुरूवात झाली आहे. आणि येत्या 2 ऑक्टोबरला पितृ पक्षाची समाप्ती होणार आहे. या काळात पितरांसाठी तर्पण, पिंड दान, श्राद्ध वगैरे केले जातात. पितृ पक्षात ग्रहण लागल्यामुळे काही राशींवर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे 5 राशींच्या लोकांना या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे? या राशी नेमक्या कोणत्या आहेत? आणि कोणत्या अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे? हे जाणून घेऊयात. (pitru paksh 2024 on these zodiac signs period face proble career and money) 

हे वाचलं का?

यंदा पितृ पक्षाच्या काळात 2 ग्रहण लागले आहेत. मीन राशीत चंद्रग्रहण झाल्यामुळे पितृ पक्षात काही राशींवर याचा वाईट परिणाम होईल. याशिवाय कन्या राशीत सूर्य आणि केतूची युती होत आहे. या दोन कारणांमुळे त्या राशींना करिअरसोबतच आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. 

मेष रास : पितृ पक्ष तुमच्यासाठी कठीण जाणार आहे. काही दिवस तुमच्यासाठी अडचणींनी भरलेले असले तरी तुमच्या करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला नवीन मार्ग शोधले पाहिजे. तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल, तर आता तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार केला पाहिजे. या काळात तुम्हाला अनेक आर्थिक संकटांना सामोरं जावं लागेल.

हे ही वाचा : Tirupati Balaji : खळबळजनक, तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये जनावरांची चरबी आणि फिश ऑईल... रिपोर्टच आला समोर!

कर्क रास :  पितृ पक्षाच्या काळात तुम्हाला नोकरीत अडचणी येऊ शकतात. खर्च वाढल्याने जबाबदाऱ्याही वाढणार आहेत. तुम्ही कितीही केलं तरी तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार नाही. नोकरी बदलण्याचा विचार तूर्तास बाजूला ठेवणं चांगलं. पुढील काही दिवस तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.

कन्या रास : कन्या राशीच्या लोकांना या काळात खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा आर्थिक तंगीमुळे तुमची डोकेदुखी वाढेल. तुमच्या जोडीदारासोबत तुमचे वाद होतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अपमानाला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या बदलत्या वर्तनामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. तुम्ही तुमच्या नोकरीमुळे त्रस्त असाल तर ती बदलणं हा योग्य निर्णय असेल.

वृश्चिक रास :  या काळात तुमचे अनेकांशी खटके उडू शकतात. त्यामुळे काही काळ वादांपासून दूर राहणं चांगलं. कृपया काहीही बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावतील. नोकरीत कर्मचाऱ्यांशी वादही होऊ शकतात.

हे ही वाचा : Dhule Crime : एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? धुळे हादरलं!

मीन रास : मीन राशीच्या लोकांनी काहीही करण्यापूर्वी नीट विचार करणं गरजेचं आहे. तुमचं एक पाऊल तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. आर्थिक अडचणी आल्यास कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. जर तुम्ही तुमची नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर तुम्ही याचा नक्कीच विचार करू शकता. व्यवसायात तुम्हाला अडचणी येतील.

(टीप : वरील माहिती सामान्य गृहितकावर आधारीत आहे. मुंबई Tak याची पृष्टी करत नाही)

    follow whatsapp