मुंबई: संतोष देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड याच्यावर असलेल्या खंडणीचा आरोप याची सध्या सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. त्यामुळेच आता विरोधक हे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. कारण अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडेंचा अत्यंत निकटवर्तीय आहे. याचबाबत आज (2 जानेवारी) पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलं आहे. (beed santosh deshmukh murder case dhananjay munde spoke about resignation for the first time but did not even mention walmik karad name)
ADVERTISEMENT
आपला या कोणत्याही प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याची मागणी चुकीचं असल्याचं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. पण माध्यमांशी बोलताना त्यांनी एकदाही वाल्मिक कराड याचं नाव घेतलं नाही.
हे ही वाचा>> Beed : बीडमध्ये पुन्हा तशीच घटना, माजी सरपंचाला उचललं, डांबून ठेवलं, पायात कुलूप असलेल्या अवस्थेत...
पाह धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले...
'मी राजीनामा द्यावा याचं काही तरी कारण लागेल ना? या कुठल्याही प्रकरणात मी ना आरोपी आहे, ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थाअर्थी संबंध आहे. आता या प्रकरणामध्ये आऊचा बाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा. अशा पद्धतीने माझा राजीनामा काही जणं मागतायेत.'
'विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. पण अशा पद्धतीचं छोटा आका, मोठा आका ही पहिल्यांदाच भाषा मी ऐकतो आहे. कोणाचा एन्काउंटर आणि कोणाचं काय.. या अशा गोष्टी नाहीए. पोलीस प्रशासन आणि सीआयडी हे व्यवस्थितपणे तपास करत आहेत.'
हे ही वाचा>> Sudarshan Ghule Beed : भाईगिरीचा नाद, नेत्यांचा 'शागीर्द', काळ्या स्कॉर्पिओवाला सुदर्शन घुले कोण?
'आमच्या दृष्टीने दिवंगत संतोष देशमुखची हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन त्यांना फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणात आहे. त्यामुळे कोणी काय बोलावं आणि कोणाचं काय होणार आणि नाही... याला काही अर्थ नाही.'
'मुळात या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे ही मागणी मी केली आहे. नागपूरच्या अधिवेशनात ही मागणी केली. त्यामुळे लगेचच राहिलेल्या आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करावी. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत माझी काहीही चर्चा झालेली नाही.'
'एक लक्षात घ्या हा तपास सीआयडीकडे दिला आहे. यामुळे त्या तपासाशी कोणत्याही प्रकारचा प्रभाव हा मी मंत्री म्हणून राहून होऊच शकत नाही. म्हणून या ठिकाणी सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशा तीनही प्रकारच्या चौकशी सुरू आहेत.'
'सर्वपक्षीय आमदारांनं एकवटणं हे एका निर्घृण हत्येबाबत झालं आहे. त्यामुळे ते काही चुकीचं झालं आहे असं म्हणता येत नाही. कारण ती घटना अतिशय चुकीची आहे. त्या घटनेमध्ये जे-जे दोषी असतील त्यांना फाशी व्हावी ही भूमिका सर्वांची आहे.' असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
