PM Modi Lok Sabha Speech Live: विरोधकांनी केलं PM मोदींना हैराण, सलग तासभर घोषणाबाजी का होती सुरू?

मुंबई तक

• 06:28 PM • 02 Jul 2024

Parliament Session 2024: पंतप्रधान मोदींच्या लोकसभेतील भाषणादरम्यान जोरदार गोंधळ केला. मोदींच्या संपूर्ण भाषणादरम्यान, विरोधकांनी मणिपूरला न्याय द्या.. अशा घोषणाबाजी केल्या.

 Narendra Modi salary Narendra Modi age Narendra Modi App Narendra Modi awards Narendra Modi Twitter Narendra Modi ka WhatsApp number Narendra Modi HD images Narendra Modi birthday

Narendra Modi salary Narendra Modi age Narendra Modi App Narendra Modi awards Narendra Modi Twitter Narendra Modi ka WhatsApp number Narendra Modi HD images Narendra Modi birthday

follow google news

PM Modi Lok Sabha Speech Live: नवी दिल्ली: देशातील नव्या सरकारचं पहिलंच अधिवेशन हे अत्यंत वादळी ठरलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासूनच विरोधक हे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आज (2 जुलै) विरोधकांनी पंतप्रधान मोदींना त्यांच्या भाषणादरम्यान, अक्षरश: हैराण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभं राहिल्यापासून पंतप्रधान मोदींना विरोधकांनी टार्गेट केलं. 

हे वाचलं का?

मणिपूरच्या खासदारांना बोलू द्यावं या मागणीवरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान, सलग तासभर घोषणाबाजी ही सुरूच ठेवली. 'मणिपूरला न्याय द्या', 'झूट बोले कौवा काटे..' यासारख्या घोषणांनी विरोधकांनी लोकसभा अक्षरश: दणाणून सोडली. 

मात्र, या सगळ्या गदारोळात देखील पंतप्रधान मोदींनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. यावेळी त्यांनी देखील काँग्रेसवर जोरदार टीका केली.

विरोधकांच्या तुफान गदारोळात पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही तिप्पट वेगाने काम करू, तिप्पट ऊर्जा वापरू आणि तिप्पट परिणाम देशवासियांना देऊ. पीएम मोदींनी 60 वर्षांनंतर सातत्याने सरकार येण्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, लोकसभा निवडणुकीसोबतच चार राज्यांमध्येही निवडणुका झाल्या. या चार राज्यांमध्येही आम्हाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. महाप्रभू जगन्नाथजींची भूमी असलेल्या ओडिशाने आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आंध्र प्रदेशात साफ सफाई केली आहे. हे (विरोधक) सूक्ष्मदर्शकातूनही दिसत नाहीत.

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : शिंदेंचे उमेदवार ठरले! 'हे' दोन नेते आमदार होणार

अरुणाचलमध्ये पुन्हा सरकार स्थापन झाले आहे, सिक्कीममध्येही एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. राजस्थानमध्येही जिंकलो. यावेळी केरळमध्ये खाते उघडले आहे. आमचे केरळचे खासदार आमच्यासोबत बसले आहेत. गेल्या वेळच्या तुलनेत कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मतांची टक्केवारी वाढली आहे. आगामी काळात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आम्हाला गेल्या विधानसभेत तीन राज्यांमध्ये मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. 

पंजाबमध्येही अभूतपूर्व पाठिंबा मिळाला आहे. जनतेचे पूर्ण आशीर्वाद आमच्या पाठिशी आहेत. देशातील जनतेने काँग्रेसलाही जनादेश दिला आहे. हा आदेश आहे - विरोधात बसा. फक्त विरोधी पक्षात बसा.. काँग्रेसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा काँग्रेसला सलग तीनवेळा शंभरचा टप्पा ओलांडता आलेला नाही. काँग्रेसच्या इतिहासातील हा तिसरा सर्वात मोठा पराभव आहे. तिसरी सर्वात वाईट कामगिरी.

हे ही वाचा>> Vidhan Parishad Election : आमदार फुटणार? विधानसभेआधी पुन्हा राजकीय भूकंप?

काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असता, जनतेने जनार्दनचा आदेश मान्य करून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते. पण ते शिर्षासन करण्यात व्यस्त आहेत. जनतेने आमचा पराभव केला आहे, हे नागरिकांच्या मनात रुजवण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. आजकाल लहान मुलांचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि मुलांचे मनोरंजन करण्याचे काम काँग्रेसचे लोक, त्यांची परिसंस्था करत आहेत. असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दीड तासाहून अधिक भाषण केलं. 

    follow whatsapp