'संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', सुदर्शन घुले कोर्टात.. नेमकं काय घडलं?

मुंबई तक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपीसह आणखी तीन आरोपींना अटक करून कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर कोर्टाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ADVERTISEMENT

'संतोष देशमुखांच खून आरोपींनी एन्जॉय केला'
'संतोष देशमुखांच खून आरोपींनी एन्जॉय केला'
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला केली अटक

point

दोन्ही आरोपींना कोर्टाने सुनावली 14 दिवसांची कोठडी

point

आरोपींबाबत कोर्टात खळबळजनक आरोप

Sudharshan Ghule: ओमकार वाबळेसह, योगेश काशिद, स्वानंद बिक्कड, बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी एसआयटीने आता चक्र वेगाने फिरविण्यास सुरुवात केली असून पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना आज (4 जानेवारी) पुण्यातून अटक केली. तर सिद्धार्थ सोनवणे याला मुंबईतून अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर कोर्टाने या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (accused enjoyed the murder of santosh deshmukh what exactly happened in  court 3 accused including sudarshan ghule were sent to 14 days police custody)

केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने या तीनही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कुठली म्हणजेच 18 जानेवारी पर्यंतची ही पोलीस कोठडी असणार आहे सीआयडी आणि एसआयटीच्या चौकशीसाठी ही पोलीस कोठडी देण्यात आली आहे. 

'संतोष देशमुखांचा खून आरोपींनी एन्जॉय केला', सरकारी वकिलांच्या युक्तिवादाने खळबळ

या हत्या प्रकरणी युक्तिवाद करताना सरकारी वकील म्हणाले की, 'यांनी टोळीने गुन्हे केले आहेत. आजूबाजूच्या लोकांवर दहशत करतात. उद्योगधंदे आहे त्यांना त्रास देतात. यांच्यामुळे आणि या संघटनेमुळे जिल्ह्यात उद्योगांची वाढ झाली नाही. 9 तारखेपासून हे फरार होते. एकाने यांचं लोकेशन सांगितलं. दुसऱ्याने त्यासाठी मदत केली. हे सगळे क्रिमिनल conspiracy मध्ये येतात. यांच्यावर 120 ब लावलं पाहिजे.

हे ही वाचा>> Sudarshan Ghule Arrested : संतोष देशमुख प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला SIT कडून अटक

संतोष देशमुख यांना रस्त्यात अडवून एके दिवशी जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. हे टोळीने गुन्हे करणारी आरोपी आहेत. संघटित गुन्हे करून दहशत निर्माण करणे, जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे करायला आलेल्या कंपन्यांना धमकावणे हा यांचा पेशा आहे. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांचा खून यांनी एन्जॉय केला आहे. या आरोपींना आता आळा घालणे गरजेचे आहे.

आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद

या प्रकरणात तुमच्याकडे संभाव्य कारण असावे... उर्वरित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही हे धक्कादायक आहे. आरोपी चाटे कोठडीत आहे. तपास आधीच सुरू आहे. खंडणी प्रकरणात अधिकारी कोठडीची मागणी करत आहेत. त्यांनी कोणत्या प्रकारची भूमिका साकारली हे त्यांना माहीत आहे का?

हे ही वाचा>> वाल्मिक कराडला आहे 'हा' आजार... नेमकं काय होतं त्यात?

त्यांच्या भाषेत आम्ही आका, असं ऐकलं आहे. म्हणजे हा विष्णू चाटे. तो आधीच कोठडीत आहे. चाटे याला अटक केली पण चौकशी नाही.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

हा गुन्हा का घडला. कसा घडला हा मुद्दा नाही. सुरुवातीला याला अट्रोसिटीमध्ये रिमांड घ्यायला पाहिजे होती. मी अजूनही मास्टरमाईंड शब्द वापरलेला नाही. पण समोरचे वकील पॉलिटिकल प्रेशरबद्दल बोलतात. पण ज्या वेळी अॅट्रोसिटी दाखल व्हायला पाहिजे होती. तिथे पीडिताला सहा तास बसवून ठेवलं. ते केलं नसतं, गुन्हा दाखल करून घेतला असतं तर हे सगळं घडलं नसतं. खून झालाच नसता. मग मी विचारतो की, त्यावेळी पॉलिटिकल प्रेशर कोणाचं होतं? त्यामुळे यांच्या बोलण्याला काही अर्थच राहत नाही.

या प्रकरणात मास्टरमाईंड कोण असा शब्द आम्ही आतापर्यंत वापरलेला नाही. तपास अधिकाऱ्यांनीसुध्दा हा शब्द वापरलेला नाही. यात पॉलिटिकल प्रेशर आहे का हे मी आता काही बोलणार नाही.

आरोपी आता अटक झाले आहेत त्यांचा पहिला रिमांड अत्यंत महत्वाचा आहे त्यानुसार 15 दिवसांच्या पोलीस कोठडीच्या मागणीचा योग्य विचार व्हावा. सर्व आरोपींवर मोक्का लावण्यासाठी सीआयडी तयारीत. बीडमध्ये संघटीत गुन्हेगारी वाढली आहे. सर्व आरोपी एकत्रित काम करत होते. It's a syndicate... असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकिलांनी यावेळी केला.

आरोपींच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय म्हटलं?

'आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांना फरार आरोपीबाबत काही माहिती घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये जे पुरावे आढळून आले आहेत जे बाकीचे आरोपी आहेत त्यांना एकमेकांसमोर बसवून त्यांची चौकशी करायची आहे.' 

'आरोपींनी कोणतं शस्त्र वापरलं हे रिमांड कॉपीमध्ये नमूद केलेलं नाही. जर शस्त्र वापरलेलं नसेल तर त्या आधारावर कोठडी घेण्याचा काहीही अधिकार नाही. ही काही काल्पनिक घटना नाही. ही घटना प्रत्यक्ष झालीए असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी पोस्टमार्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरांचं मत घ्यायला पाहिजे. या घटनेत मयताला ज्या हत्यारांनी मारलेलं आहे तर ती हत्यारं कोणकोणती असू शकतात?' 

'जी हत्यारं जप्त केली आहेत त्या हत्यारांशिवाय दुसरी काही हत्यारं आहेत का? असं त्यांनी सांगणं आवश्यक आहे.' 

'हा गुन्हा 302 चा आहे. त्यांनी त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे मोक्का लावावा. तर संघटीत गुन्हेगारी निष्पन्न होईल.' 

'नाही.. आमचा आका वैगरे असा काही संबंध नाही. आता त्यांचं म्हणणं आहे. विष्णू चाटे यांना अटक करून 20 दिवस झाले आहेत. विष्णू चाटेंना खंडणीच्या गुन्ह्यात घेतलं आहे. वास्तविक पाहता 140 गुन्हा आहे. तर त्यांनी त्या आरोपींना यामध्ये घेणं आवश्यक होतं. पण त्यांनी तसं केलेलं नाही. त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलं आहे. यावरून तपास अधिकारी, तपास यंत्रणा किती गांभीर्याने प्रकरण हाताळतं हे स्पष्टपणे दिसतं.' 

'त्यांनी (सरकारी वकिलांनी) सिंडीकेट हा शब्द वापरला होता. तर सिंडीकेटचा कोणी तरी लीडर असला पाहिजे ना. सिंडीकेटचा यामध्ये काही संबंध नाही. पण त्यांनी हा शब्द वापरला जो मोक्कामध्ये वापरला जातो. यामुळे यांचा लीडर कोण? असा त्याचा अर्थ होता.' असं ते यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp