एग्जिट पोल

Devendra Fadnavis : फडणवीस सरकारमधून बाहेर पडणार! शिंदे सरकार धोक्यात येईल का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांनी घेतली पराभवाची जबाबदारी

point

उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी

point

पक्ष संघटनेचे काम करण्याची तयारी

Maharashtra politics : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात मानहानीकारक अपयशाला सामोरे जावे लागले आहे. 2019 मध्ये तब्बल 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी फक्त 9 जागाच जिंकता आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे भाजपला २०१९ मध्ये जिंकलेल्या जागांपैकी ६ जागाच भाजपला राखता आल्या आहेत. याची चर्चा होत असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यामुळे शिंदे सरकारचं काय होणार अशीही चर्चा सुरू झाली आहे. (Devendra Fadnavis wants to Quit from Maharashtra government As deputy chief minister)

लोकसभा निवडणुकीत भाजपला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निकालानंतर महाराष्ट्र भाजपची भूमिका काय असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. पण, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभवाची जबाबदारी स्वीकारत मोठी घोषणा केली. या घोषणेचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. पण, फडणवीस काय म्हणाले ते वाचा...

"शेवटी कितीही गणित मी मांडलं तरी जागा कमी आल्या आहेत. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपमध्ये मी करत होतो. त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल, ज्या काही जागा कमी आल्या असतील, याची सगळी जबाबदारी माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी हे मान्य करतो की, कुठेतरी मी स्वतः यामध्ये कमी पडलो आहे. ती कमरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहे. त्यामुळे हा जो काही भाजपला सेटबॅक महाराष्ट्रात सहन करावा लागला. याची सगळी जबाबदारी ही मी देवेंद्र फडणवीस स्वीकरतो. मी पक्षाला आणखी एक विनंती करणार आहे. अर्थात भाजपमध्ये पक्ष सगळे निर्णय करतो. आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ उतरायचं आहे. त्याच्यामुळे भाजपच्या नेतृत्वाला विनंती करणार आहे की, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्णवेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी. जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत. त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल. अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे. ती आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणारच आहे. यासंदर्भात लवकरच पक्षाच्या वरिष्ठांना मी भेटणार आहे. मग त्यांच्या सल्ल्याने, ते जे सांगतील त्यानुसार पुढील कारवाई करेन."

पराभवाची जबाबदारी स्वीकारताना फडणवीस जे बोलले, त्यातून काही गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहे. त्याचे काही अर्थही काढले जात असून, यात एक चर्चा अशीही होत आहे की, फडणवीस सरकारमध्ये राहणार नसतील, तर मग शिंदेंच्या सरकारचे काय होणार आहे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात भाजपचे सर्वाधिक आमदार

सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकार असले, तरी सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहे. फडणवीस हे सध्या सरकारमध्ये आणि राज्यातील भाजपचा चेहरा आहेत. त्यामुळे जर फडणवीस सरकारमध्ये नसतील, तर सरकारमध्ये भाजपचा चेहरा कोण असेल? हा प्रमुख प्रश्न आहे. दुसरं असं की फडणवीस बाहेर पडले तर शिंदे सरकारचं काय होईल?

हेही वाचा >> महाराष्ट्राने निवडलेले 48 खासदार कोण? पहा संपूर्ण यादी 

शिंदे सरकारचं काय होईल, याचं उत्तर स्वतः फडणवीस यांनी स्वतःच दिले आहे. ते म्हणाले की, 'बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये जे काही आम्हाला करायचं आहे. ती आमची टीम करेल. त्यांच्यासोबत मी असणारच आहे.' याचा अर्थ महाराष्ट्रातील शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार कायम राहणार आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> मुंडेंचा बालेकिल्ला ढासळला! पंकजां मुंडेंचा निकाल काय? 

दुसरं असं की पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुकीच्या होणार आहेत. अशा वेळी सरकार आपलं असणं हे महायुतीच्या फायद्याचेच असणार आहे, असे राजकीय विश्लेषक म्हणताहेत. त्यामुळे फडणवीस जरी बाहेर पडले तरी महायुतीचे सरकार कायम राहील असेच दिसत आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT