Baramati Lok Sabha: 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजेत', श्रीनिवास पवारांचं चॅलेंज

मुंबई तक

ADVERTISEMENT

'अजितदादांना शरद पवारांची ताकद कळली नाही म्हणजे आश्चर्य..'
'अजितदादांना शरद पवारांची ताकद कळली नाही म्हणजे आश्चर्य..'
social share
google news

Shrinivas Pawar vs Ajit Pawar: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत पवारांविरुद्ध अनेक नेते हे बारामतीत उभे राहिले मात्र कुणालाही फारसं यश मिळालं नाही. मात्र, यंदा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच सुप्रिया सुळेंविरुद्ध उभ्या राहिल्या आहेत. ज्यामुळे थेट कुटुंबातच फूट पडली आहे. एवढंच नव्हे तर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्वत: अजित पवारांना खुलं आव्हान देण्यास सुरुवात केली आहे. (lok sabha election 2024 baramati lok sabha ajitdada should remove his mustache now brother shrinivas pawar challenge)

दोनच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी बारामतीकरांना असं म्हटलं होतं की, सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्यांपैकी कुणीही जर 7 मे नंतर तुमच्याकडे आलं तर मिशा काढून देईन. 

अजित पवारांच्या याच विधानाचा खरपूस समाचार हा श्रीनिवास पवार यांनी घेतला आहे. मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवास पवार म्हणाले की, 'अजितदादाने आताच मिशा काढल्या पाहिजे...'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा श्रीनिवास पवार नेमकं काय म्हणाले..

'मी ऐकतो की, दादा शब्दाचे पक्के आहेत.. फक्त ते जे बोललेत ते त्यांनी लक्षात ठेवावं. कारण निवडणूक झाल्यावर.. तुमच्या माहितीसाठी सांगतो रणजीत आणि राजू दादा हे इथे राहतात. त्यांचं घरच इथे आहे. त्यामुळे इतके वर्ष ते इथे काम करत आहेत. त्याने जर सगळ्यांसाठी बोललं असेल तर त्याने आताच मिशा काढल्या पाहिजेत. त्यासाठी उद्या काय होईल हे बघायची गरज नाही.' 

'रोहितचं देखील घर इथे आहे.. त्याची शेती इथे आहे तो आमदार तिथला असला तरी तीन दिवस तिथे आणि तीन दिवस इथे असतो. तो जन्मानेच बारामतीकर आहे.' 

हे ही वाचा>> अजितदादामुळे आई चक्क गाव सोडून पुण्याला..: श्रीनिवास पवार

'फक्त राहता राहिला प्रश्न माझा.. माझा मुलगा 3 दिवस असतो इथे.. त्याचे व्यवसाय इथे आहेत, माझी शेती इथे आहे. तो म्हणाला डीलरशीप बघायला जातील. माझी एक डीलरशीप पण इथे आहे नाही असं नाही.. त्यामुळे मी येत-जात राहतो. माझा पण इथे मुक्काम असतो..' 

ADVERTISEMENT

'फक्त दिलेला शब्द पाळावा माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे. दादांना मिशा काढायची वेळ येऊ शकते नाही.. तर लोकांना माहितीए.. वेळ यायची गरजच नाही. तो जे बोललाय तेच चुकीचं बोललाय. कारण मी सोडून बाकीचे इथेच राहतात. त्यांचं घरच इथे आहे. फक्त मी मुंबईला राहतो.' 

ADVERTISEMENT

'जर माझ्या एकट्यावर बोलला असेल तर थोडं थांबा.. पण बाकीच्या सगळ्यांवर बोलला असेल तर त्याने केलं पाहिजे. त्याने मिशा काढल्या पाहिजे.'

'मला पण वाईट वाटतं, कारण तो स्वत: पण भावनिक माणूस आहे. कुटुंब पण त्याला भयंकर प्रिय आहे. पण जेव्हा त्याला कळलं की, सीट आपल्या हातून सुटली आहे.. तेव्हा त्याला कळत नाही की, कसं ते बांधायचं.' 

हे ही वाचा>> Maharashtra Live : पवारांच्या उमेदवाराची ताकद वाढली; 'या' उमेदवाराने घेतली माघार

'त्याला सुरुवातीला काय वाटलं तेच कळत नाही.. कारण शरद पवारांची ताकद 50 वर्ष, 60 वर्ष त्यांच्या बरोबर राहून जर त्याला कळली नाही तर आश्चर्य आहे. कारण त्याने स्वत: मला पण सांगितलं आहे की, काय ताकद आहे त्यांची ते.. जेव्हा आम्ही पूर्वी बोलायचो तेव्हा..' 

'मात्र, आता ते त्यालाच कळलं नाही. अशी काय मजबुरी होती की, ते तो विसरला.. आम्हाला पण वाटतं की, जो सभा गाजवायचा.. त्याला बोलताना काय बोलावं ते सुचत नाही. कारण दादाचा जो ऑरा होता ते आता त्याला कोणीही काही बोलायलं लागलं. त्याचं आम्हाला पण वाईट वाटतंय. पण त्याने स्वत: ओढावून घेतलं आहे.' असं म्हणत श्रीनिवास पाटलांनी थेट अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. 

'...तर मिशी काढून देईन तुम्हाला', अजित पवार नेमकं काय म्हणालेले?

बारामती तालुक्यात रस्त्यांची एवढी कामं झाली नाहीत, तेवढी रस्त्यांची कामं या 5 वर्षात केली की नाही? कुठल्याही रस्त्याला जा.. काही थोडसं राहिलं असेल. ते पण आपणच करणार दुसरं कोणी करणार नाही. दुसऱ्या कोणाचा घास नाही.. ते नुसते आता प्रचाराकरता येतात. 

7 तारीख होऊ द्या.. याच्यातील एक माई का लाल आला तुम्हाला भेटायला.. मिशी काढून देईन तुम्हाला.. खोटं नाही सांगत. 

काही यांना पडलेलं नाही. ते म्हणतील आम्हाला आमचा धंदाय.. आम्हाला आमच्या गाड्या विकायच्यात, आमच्या शोरूमचं कोण बघणार?, आमच्या अॅग्रोचं कोण बघणार?, माझं कर्जत-जामखेडचं कोण बघणार? ही असली सगळी यांची नौटंकी चालेल.. 

हे माझ्या घरातलेच आहेत.. पण आता फार तोंड असं का चुरचूर.. पोपट कसा बोलतो.. अरे तुम्ही माझ्यासमोर या.. तुम्ही तिथं बोला मी इथे बोलतो.. बघू बरं कोण बोलायला ऐकतो..

उगीच आम्ही गप्प बसतोय.. नको बाबा.. आपलेच दात, आपलेच ओठ.. कुठे लोकांसमोर पंचनामा करायचा. लोकांना तर बघायचंच आहे.. हा काय बोलला आता तो काय बोलतोय.. अरे त्या उत्तराने काय तुमचं ना माझं पोट भरणार आहे का? का पाणी येणारए, मंजुरी येणार का निधी येणारए दिल्लीतून? 10 वर्ष निधी आला नाही.. असं विधान अजित पवारांनी जाहीर सभेत केलं होत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT