Lok Sabha Election 2024: शिवसेनेमुळे भाजपला कापावं लागलेलं सोमय्यांचं तिकीट, आता BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला...

रोहित गोळे

ADVERTISEMENT

BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला चार खासदारांचं कापाव लागलं तिकीट
BJP मुळे शिंदेंच्या शिवसेनेला चार खासदारांचं कापाव लागलं तिकीट
social share
google news

Lok Sabha Election BJP, Shiv Sena: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रात भाजप खूपच आक्रमक असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण महायुतीमध्ये भाजप प्रचंड प्रबळ असून त्यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना उमेदवार द्यावे लागत आहेत किंवा बदलावे लागत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघ.. (lok sabha election 2024 due to pressure from uddhav thackeray bjp had to reject kirit somayya candidacy in 2019 now because of bjp shinde shiv sena has rejected ticket of four current mp)

भाजपचा दवाब, शिंदेंनी जाहीर केलेला उमेदवारच बदलला.. 

शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर करताना हिंगोलीतून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाच उमेदवारी दिली होती. मात्र, हेमंत पाटलांना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी तीव्र विरोध केल्याने आता शिंदेंवर त्यांचं तिकीट कापण्याची नामुष्की ओढावली आहे. 

भाजपचा वाढता दवाब यामुळे एकनाथ शिंदेंना उमेदवारच बदलावा लागला आहे. पहिली यादी जाहीर करताना शिंदेंच्या शिवसेने हिंगोलीतून हेमंत पाटलांना तिकीट जाहीर केलं होतं. पण आज (3 एप्रिल) त्यांचं तिकीट कापत बाबूराम कदम कोहळीकर यांना तिकीट देण्याचा निर्णय शिंदेंनी घेतलाय.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी 2 खासदारांची तिकीट कापली

यावरूनच आता महायुतीत भाजप किती शक्तीशाली आहे हे पाहायला मिळतंय. दरम्यान, यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या अनेक खासदार आणि नेत्यांची धाकधूक वाढली आहे. 

याशिवाय आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. कारण त्यांच्यासोबत गेलेल्या कृपाल तुमाने, हेमंत पाटील, भावना गवळी या तीन खासदारांचं तिकीटच कापण्यात आलंय. याशिवाय आणखीही काही खासदारांचं तिकीट कापलं जाऊ शकतं. त्यामुळे शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांची नाराजी वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

2019 ला शिवसेनेमुळे भाजपला कापावं लागलेलं किरीट सोमय्यांचं तिकीट

दरम्यान, बरोबर 5 वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा निर्णय हा भाजपला घ्यावा लागला होता. 2019 लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या दबावामुळे भाजपला त्यांचे फायरब्रँड नेते किरीट सोमय्या यांचं तिकीट कापावं लागलेलं. 

ADVERTISEMENT

2014 विधानसभा निवडणुकीआधी भाजप-शिवसेनेची युती तुटली होती. मात्र, निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांची युती झाली. पण तरीही दोन्ही पक्षांमधील वाद हे चव्हाट्यावर येतच होते. त्यातच 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीवेळी या दोन्ही पक्षातून विस्तवही जात नव्हता. 

त्याचवेळी भाजपचे खासदार असलेले किरीट सोमय्या हे मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि विशेषत: उद्धव ठाकरेंविरोधात अत्यंत आक्रमक प्रचार करत होते. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शेल कंपन्या असल्याचे गंभीर आरोपही केले होते. सोमय्यांचे हेच आरोप उद्धव ठाकरेंच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. 

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपमध्ये यथावकाश समेटही झाला. दरम्यान, 2019 लोकसभा निवडणुका जवळ येताच अमित शाह यांनी 'मातोश्री'वर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेत युतीसाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली देखील. पण त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीसाठी शाहांकडून दोन गोष्टी मान्य करून घेतल्या होत्या.

हे ही वाचा>> Devendra Fadnavis : ''धोत्रेंच्या पाठीशी महायुती, पवार साहेब सुद्धा...'',

एक म्हणजे पालघरची जागा शिवसेनेला देण्याची आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे किरीट सोमय्यांना भाजपने तिकीट न देण्याची. 

2019 च्या निवडणुका जसजशा जवळ येत होत्या तसतसा शिवसेने किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक प्रचार सुरू केला होता. जर सोमय्यांना तिकीट देण्यात आलं तर शिवसेना देखील मुंबई ईशान्य मतदारसंघात उमेदवार देईल अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपच्या दृष्टीने प्रत्येक जागा ही अत्यंत महत्त्वाची होती आणि त्याठिकाणी भाजप जोखीम पत्करण्यास तयार नव्हतं. 

अखेर शिवसेनेचा वाढता दबाव लक्षात घेता  भाजपने मुंबई ईशान्यमधून किरीट सोमय्या यांचं तिकीट कापून मनोज कोटक यांना उमेदवारी देऊ केली. त्यामुळे तिथे असणारा शिवसेनेचा विरोध देखील मावळला होता आणि मनोज कोटक हे भरघोस मतांनी निवडून आले होते. 

दरम्यान, यंदा किरीट सोमय्या यांना लोकसभा तिकीटाची अपेक्षा होती. मात्र, यंदाही भाजपने त्यांचं तिकीट कापलं. एवढंच नव्हे तर तेथील विद्यमान खासदार मनोज कोटक यांनाही भाजपने उमेदवारी न देता मिहीर कोटेचा यांना तिकीट दिलं. 

2019 आणि 2024 मधील या दोन्ही घटना लक्षात घेतल्यास सध्या महाराष्ट्रात महायुतीत भाजप हे अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येतंय तर शिंदेंची शिवसेना ही काहीशी बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT