ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम? अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Amitabh Bacchan
Amitabh Bacchan
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर मोठी अपडेट

point

अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमध्ये काय म्हणाले?

point

घटस्फोटाच्या चर्चांबाबत अभिषेक बच्चन यांचंही मोठं विधान

Aishwarya Rai And Abhishek Bacchan Divorce Rumours Latest Update : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या भव्यदिव्य लग्नसोहळ्यात ऐश्वर्या रायने तिची मुलगी अराध्यासोबत उपस्थिती दर्शवली होती. परंतु, फोटोसेशनमध्ये अभिषेक त्यांच्यासोबत दिसले नाहीत. अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत अंबानी कुटुंबाच्या लग्नसोहळ्यात ग्रँड एन्ट्री केली होती. पण ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र न दिसल्याने सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. त्यानंतर अभिषेक यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. अशातच दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. (Abhishek Bachchan and Aishwarya Rai have been rumored to be getting a divorce. Aishwarya Rai along with her daughter Aaradhya attended the grand wedding of Anant Ambani, son of industrialist Mukesh Ambani and Radhika Merchant. But, Abhishek was not seen with them in the photo session)

हे ही वाचा>> Ajit Pawar: सुप्रिया सुळेंना राखी बांधणार का? अजितदादांनी दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय म्हणाले?

अमिताभ बच्चन त्यांच्या ब्लॉगमध्ये काय म्हणाले?

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की, काही दिवसांपासून स्टुडिओत काम सुरु होतं. या कामात मी व्यस्त होतो. शांततापूर्ण वातावरणात आजचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ घालवला. कामात व्यग्र असल्याने असा एखादाच दिवस मिळतो. ज्या दिवशी माला कुटुबीयांसोबत राहता येतं. मला माझ्या प्रकृतीची काळजी घेता येते.

विश्रांती घेऊ शकतो. उरलेली कामं पूर्ण करु शकतो. स्टुडिओत व्यस्त असल्याने माझ्या वैयक्तिक आणि व्यवसायीक जीवनात समतोल साधता येईल, मी ज्या गोष्टी ठरवल्या आहेत. त्या पूर्ण करता येतील. या क्षेत्रात प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रतिसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्यांचे मतं, टीका टीपण्णीमुळं कायमची जबाबदारी वाढते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mazi Ladki Bahin Yojana: बँकेत खातं नसेल तरी मिळतील 1500 रुपये, फक्त...

त्या पूर्ण करता येतील. या क्षेत्रात प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रतिसादाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण त्यांचे मतं, टीका टीपण्णीमुळं कायमची जबाबदारी वाढते. अमितभा बच्चन यांनी 'कल्की: २८९८ एडी' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसच बच्चन यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांकडून कौतुकही केलं जात आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या १६ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT