Manoj Jarange : 'मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचंय, पण त्यांना...', जरांगेंचा रोख नेमका कुणावर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

manoj jarange criticize devendra fadnavis eknath shinde mahayuti government maharashtra assembly election maharashtra politics
फडणवीस साहेबांनी आमच्या लाखो पोरांवर केसेस टाकल्या
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फडणवीस साहेबांनी आमच्या लाखो पोरांवर केसेस टाकल्या

point

तुमच्या सोबत ओबीसी पण नाही

point

महायुतीने आम्हाला हिन वागणूक दिली

Manoj Jarange On Eknath Shinde : गौरव साळी, जालना :  महाराष्ट्रात विधानसभेची निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. मंगळवारीच जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढवला होता. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ''मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचंय पण, तुम्हाला कोण काम करून देत नाहीये,हे आम्हाला समजत नाही आहे, असे मोठं विधान जरांगेंनी केले आहे. (manoj jarange criticize devendra fadnavis eknath shinde mahayuti government maharashtra assembly election maharashtra politics)

जालन्यात जरांगेंची पत्रकार परिषद पार पडली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे म्हणाले की,  ''मी रोज म्हणतोय, मराठ्यांना आरक्षण फक्त शिंदे साहेबच देऊ शकतात. तेवढाच एक धाडसी माणूस आहे, जो मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो. मी रोज म्हणायचो ना, पण दिलंच नाही तुम्ही. तुम्ही शब्द खरा करून दाखवलाच नाही. किंवा तुम्हाला खरा करू दिला नाही. 'मुख्यमंत्री शिंदेंना आरक्षण द्यायचंय पण, तुम्हाला कोण काम करून देत नाहीये,हे आम्हाला माहित नाही आहे, असे जरांगे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Ajit Pawar : "लाडकी बहीण योजना तात्पुरती नाही...", अजित पवारांनी महिलांना दिली आनंदाची बातमी

जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

तुम्ही कर्ज माफी केली असती तर आम्हाला दिवाळीत कर्ज काढायची वेळ आली नसती असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता केलाय. फडणवीस साहेबांनी आमच्या लाखो पोरांवर केसेस टाकल्या, त्यांनी आमचा खूप फायदा केला असं म्हणत जरांगेंनी फडणवीस यांना टोला लगावलाय. तुम्ही निवडून येण्यासाठी आमच्या सोबत ओबीसी आहेत असा दिखावा करताय; तुमच्या सोबत ओबीसी पण नाही असा निशाणा जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर साधलाय. महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा आम्हाला हीन वागणूक तुम्ही दिली अशी टीका जरांगे यांनी महायुतीवर केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Baba Siddique : सलमान खान नाही...'या' कारणासाठी झाली सिद्दीकींची हत्या, Inside Story

कागदपत्रे तयार ठेवा, 3 दिवसात अर्ज...

20 तारखेला मराठा समाजाची बैठक बोलावून अंतिम निर्ण घेणार आहे, असे देखील मनोज जरांगे म्हणाले आहेत. विधानसभेच्या उमेदवारांशी मी उद्या 9 ते 4 वाजेपर्यंत चर्चा करणार आहेत. त्यामुळे ज्या बांधवांनी अर्ज केले आहेत, त्यांनी चर्चेसाठी यावे, असे जरांगेंनी आवाहन केले आहे. 20 तारखेच्या बैठकीमध्ये आपण उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत चर्चा करणार आहोत. 20 तारखेला जर लढायचे ठरले तर अर्ज कण्यासाठी तीन दिवसच उरणार आहे. त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तीन दिवस मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कागदपत्रे तयार ठेवावी, असे आवाहन जरांगेंनी इच्छुक उमेदवारांना केली आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT