Rohit Sharma : कोहलीनंतर रोहित शर्मानेही घेतला 'तो' निर्णय, म्हणाला...

मुंबई तक

Rohit Sharma Retired From T20 Cricket : विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर रोहित शर्मानेही चाहत्यांना धक्का दिला.

ADVERTISEMENT

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर आनंद व्यक्त करताना कर्णधार रोहित शर्मा.
रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधून संन्यास घेतला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रोहित शर्माची आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेेटमधून निवृत्ती

point

विराट कोहलीनंतर रोहित शर्माने केली घोषणा

point

टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर शर्माचा निर्णय

Rohit Sharma News : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी दणदणीत पराभव करून T20 विश्वचषक जिंकला. देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. पण, दोन भारतीय क्रिकेटपटूंनी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला. दोघांनी T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. आधी विराट कोहलीने जाहीर केले की, हा त्याचा शेवटचा टी-20 क्रिकेट सामना होता, तर काही वेळाने कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (after Virat Kohli Rohit Sharma announced retirement from t20 international cricket)

आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरही ही माहिती दिली आहे. आयसीसीने लिहिले की, "विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे."

खरं तर, 37 वर्षीय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 29 जून रोजी इतिहास रचला. भारताने टी20 विश्वचषकावर नाव कोरले. या विश्वचषकासह भारताने चौथ्यांदा विश्वचषक (ODI, T20) जिंकला आहे.

हेही वाचा >> भारताचा ऐतिहासिक विजय, 13 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कप 

भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. या विश्वचषक विजयामुळे 140 कोटी भारतीयांना जल्लोष करण्याची सुवर्णसंधी मिळाली. पण, विजयाचा जल्लोष सुरू असतानाच कोहली आणि रोहित शर्माच्या टी-२० मधून निवृत्ती घेतल्याच्या घोषणेने क्रिकेट चाहत्यांनाही धक्का बसला.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला, "हा माझा शेवटचा सामना होता. निवृत्ती घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मला ती (ट्रॉफी) खूप हवीच होती. हे सगळं शब्दात मांडणे खूप कठीण आहे. हे असेच व्हावे, अशी माझी इच्छा होती आणि तसेच घडले. माझ्या आयुष्यात या गोष्टींची मला खूप तीव्र इच्छा होती. मला आनंद वाटतोय की ते आम्ही मिळवले आहे."

हे आहेत रोहित शर्माचे T20 रेकॉर्ड

रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 121 आहे. 

2007 मध्ये T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो भाग होता आणि भारतासाठी दोन T20 विश्वचषक जिंकणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. रोहित शर्माने 2007 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा >> कोहलीने चाहत्यांना दिला धक्का, केली मोठी घोषणा

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 2022 च्या टी20 विश्वचषकात खेळला होता. पण, उपांत्य फेरीत संघाला इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. एका वर्षानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने मायदेशात एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती.

अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.

रोहित शर्माची T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द

एकूण T20 सामने - 159
धावा - 4231
सरासरी - 32.05
स्ट्राइक रेट - 140.89
शतके - 5
अर्धशतके - 32
षटकार - 205
चौकार - 383

हे वाचलं का?

    follow whatsapp