मोठी बातमी: महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटासाठीच्या लसीकरणाला ब्रेक, आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई तक

• 07:24 AM • 11 May 2021

मुंबई: कोरोनाच्या बचाव हा फक्त आणि फक्त लसीकरण्याच्या माध्यमातूनच होतो हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. अशावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं आहे. पण आता याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध नसल्याने आता महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: कोरोनाच्या बचाव हा फक्त आणि फक्त लसीकरण्याच्या माध्यमातूनच होतो हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. अशावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात लसीकरण होणं गरजेचं आहे. पण आता याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुरेशा प्रमाणात लसच उपलब्ध नसल्याने आता महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: आज (11 मे) पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. त्यामुळे आता मोठा गाजावाजा करुन जे 18 ते 45 या वयोगटासाठी जे लसीकरण सुरु करण्यात आलं होतं त्याला आता ब्रेक लागला आहे.

हे वाचलं का?

18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला का लागला ब्रेक?

आजवर लसीकरणात ४५ वयाच्या वरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं आहे. पण आता महाराष्ट्रात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, याच वयोगटातील नागरिकांचं बरचंस लसीकरण हे शिल्लक राहिलं आहे. स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत जी माहिती दिली ती आपणा सर्वांना विचार करायला लावणारी आहे.

‘आज घडीला राज्यात 45 वयाच्या वरील ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे पण ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशांची संख्या ही 5 लाख एवढी आहे. केंद्र सरकारकडून या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनचे फक्त 35 हजार डोस आपल्याकडे आता उपलब्ध आहे. पण महाराष्ट्र सरकारने 18 ते 44 वयोगटासाठी कोव्हॅक्सिन लसीचे जे पावणे तीन लाख डोस विकत घेतले होते असे मिळून तीन ते सव्वातीन लाख डोस हे आता 45 वयोगटातीला लोकांच्या दुसऱ्या डोससाठी वापरले जाणार आहेत.’ अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबई-पुण्यातील लोकांचा ग्रामीण भागातील लसींवर डल्ला, गावकरी प्रचंड नाराज

एवढंच नव्हे तर 45 च्या वरील ज्या नागरिकांनी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे पण ज्यांना दुसरा डोस अद्याप मिळू शकलेला नाही अशा लोकांची संख्या ही तब्बल 16 लाख एवढी आहे. जे केंद्र सरकारने देणं गरजेचं आहे. पण अद्याप लस आपल्याला उपलब्ध होऊ शकलेल्या त्यामुळे आता आरोग्य विभागाने सर्व लसीकरण केंद्रांना आदेश दिले आहेत की, 18 ते 44 वयोगटासाठी आलेले लसींचे डोस हे ४५ च्या पुढील नागरिकांसाठी ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना प्राधान्याने देण्यात यावेत. अशी माहिती देखील आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.

मात्र, या सगळ्याचा परिणाम आता हा 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावर होणार आहे. कारण 18 ते 44 वयोगटासाठी आलेल्या लसी या 45 वयाच्या वरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी वळविण्यात आले आहेत. एका अर्थी लसीकरणाच्या एकूण कार्यक्रमाला हा एक प्रकारे धक्काच आहे.

भारताने 80 देशांना 6 कोटींपेक्षा जास्त Vaccines पाठवल्या, मोदींच्या निर्णयामुळे लस तुटवडा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशाला संबोधित करताना असं म्हटलं होतं की, देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं गेलं पाहिजे. पण असं असलं तरी राज्यांना मोठ्या प्रमाणात लसी उपलब्ध होत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचीच परिणिती म्हणून आता महाराष्ट्रातील 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला ब्रेक लागला आहे.

    follow whatsapp