IND vs SA Final : भारताचा ऐतिहासिक विजय, 13 वर्षानंतर जिंकला वर्ल्ड कप

मुंबई तक

29 Jun 2024 (अपडेटेड: 30 Jun 2024, 12:06 AM)

Ind vs sa Final Match : भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत टीम इंडीयाने टी20 वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले आहे. टीम इंडीयाने तब्ब्व 13 वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे.

team india won t20 world cup 2024 india vs south africa final match virat kohli hits half century axar patel shivam dube

भारताने टी२० वर्ल्ड कपवर कोरले नाव.

follow google news

Ind vs sa Final Match : भारताने आयसीसी टी20 वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत टी20 वर्ल्ड कप (t20 world cup 2024) ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडीयाने तब्बल 13 वर्षानंतर वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावली आहे. या आधी भारताने 2011 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर आता 13 वर्षानंतर भारताला ही कामगिरी करता आली आहे. (team india won t20 world cup 2024 india vs south africa final match virat kohli hits half century axar patel shivam dube)

हे वाचलं का?

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात चांगली होती. सामन्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा दक्षिण आफ्रिका सामना जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सूर्यकुमार यादवचा अखेरच्या षटकातील झेल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीने भारत टी20 चॅम्पियन ठरला.. भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला आहे. 

दरम्यान याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीच निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार विराट आणि रोहितच्या जोडीने तुफानी सुरुवात केली होती. मात्र केशव महाराजने येऊन टीम इंडियाचे एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतले होते. केशव महाराजने रोहित शर्माला 9  धावावर आऊट केले. त्यानंतर मैदानावर आलेल्या रिषभ पंतला शुन्य धावावर बाद केले. 

हे ही वाचा : भाजपचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात? 1 कोटीची मागितली खंडणी; प्रकरण काय?

पंतनंतर मैदानावर आलेल्या सुर्यकुमार यादववर चांगल्या खेळीची अपेक्षा होती.मात्र त्याला देखील मोठी खेळी करता आली नाही आणि तो 3 धावावर स्वस्तात बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेल्या अक्षर पटेल आणि विराटने डाव सांभाळला. अक्षर पटेलने 31 बॉलमध्ये 41 धावांची खेळी केली, त्यानंतर तो रनआऊट झाला. त्यानंतर शिवम दुबेने 27 धावांची खेळी केली. मात्र तो देखील आऊट झाला.

एका बाजूने विकेट पडत होते, तर दुसऱ्या बाजूने विराट कोहली एक बाजू धरून होता. मात्र 76 धावावर तो देखील आऊट झाला. विराटने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानंतर रविंद्र जडेला 2 धावावर आऊट झाला. आणि हार्दिक पंड्या 5 धावावर नाबाद राहिला. या धावांच्या बळावर टीम इंडीयाने 7 विकेट गमावून 176 धावांचा डोंगर उभारला होता.

    follow whatsapp