26/11 हल्ल्यातील आजवरची सर्वात मोठी बातमी, कसाबनंतर आणखी एक आरोपी आता...

मुंबई तक

26/11 Terrorist Attack: 26/11 मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे.

ADVERTISEMENT

कसाबनंतर आणखी एक आरोपी आता भारताला जिवंत मिळणार
कसाबनंतर आणखी एक आरोपी आता भारताला जिवंत मिळणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी नवी माहिती समोर येण्याची शक्यता

point

आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेची मान्यता

point

तहव्वूर राणानेच हल्लाच्या ठिकाणांची केलेली रेकी

26/11 Attack: मुंबई: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आहे. या प्रकरणात त्याच्या शिक्षेविरुद्धची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा याच्यावर 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे. (way is cleared to bring mumbai terror attack convict tahawwur rana to india usa supreme court approves extradition)

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणा हवा असल्याने भारत त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी करत होता. अखेर आता त्या मागणीला यश आलं आहे. त्यामुळे आता 26/11 हल्ल्याबाबत काही नवी माहिती देखील समोर येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा>> Mumbai 26/11 Attack: 10 अतिरेक्यांनी मुंबईला 60 तास धरलं वेठीस… 15 वर्षापूर्वी कसा झाला होता हल्ला?

13 नोव्हेंबर रोजी तहव्वूर राणाने या प्रकरणाच्या पुनरावलोकनासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे.

कोण आहे तहव्वूर राणा?

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी तहव्वूर राणा याचे नाव आरोपपत्रात समाविष्ट केले होते. त्याच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा यांचा सक्रिय सदस्य म्हणून काम केल्याचा आरोप आहे. आरोपपत्रात राणावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचा आरोप होता. तहव्वुर राणा यानीच मुंबईत हल्ले होणार असलेल्या ठिकाणांची रेकी केली होती आणि ब्लूप्रिंट तयार करून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांना दिलं होतं.

हे ही वाचा>>  26/11 Mumbai Attack: करकरेंचा मृत्यू नेमका कोणाच्या गोळीमुळे? चार्जशीटमध्ये नेमकं काय?

तहव्वूर राणा हा डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र

तहव्वूर राणा हा डेव्हिड कोलमन हेडली उर्फ दाऊद सईद गिलानीचा बालपणीचा मित्र आहे. हेडली हा अमेरिकन नागरिक आहे. त्याची आई अमेरिकन होती आणि वडील पाकिस्तानी होते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्याला ऑक्टोबर 2009 मध्ये शिकागो येथून अटक केली होती. 24 जानेवारी 2013 रोजी, हेडलीला मुंबई हल्ल्यात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आणि अमेरिकेच्या न्यायालयाने त्याला 35 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तहव्वूर राणाने पाकिस्तानातील हसन अब्दाल कॅडेट स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे, जिथे हेडलीने देखील अमेरिकेत जाण्यापूर्वी पाच वर्षे शिक्षण घेतलं होतं.

पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केल्यानंतर, तहव्वूर राणा कॅनडाला गेला आणि काही वर्षांनी त्याला कॅनडाचे नागरिकत्वही मिळाले. त्यानी शिकागोमध्ये 'फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिसेस' नावाची एक कन्सल्टन्सी फर्म सुरू केली होती. राणाच्या कंपनीची मुंबईतही एक शाखा होती, ज्यामुळे कोलमन हेडलीला 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या मुंबईतील ठिकाणांची रेकी करण्यास मदत झाली होती.

पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांनी हादरवलेली मुंबई

26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कराचे 10 दहशतवादी मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे घेऊन समुद्रमार्गे मुंबईत घुसले होते. त्यांनी मुंबईत 9 ठिकाणी भयानक असा हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणांपैकी आठ जागा या दक्षिण मुंबईतच होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ओबेरॉय ट्रायडंट हॉटेल, ताज हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरिमन हाऊस, मेट्रो सिनेमा आणि टाइम्स ऑफ इंडिया बिल्डिंग आणि सेंट झेवियर्स कॉलेजच्या मागे असलेली गल्ली. मुंबईतील बंदर क्षेत्र माझगाव आणि विलेपार्ले येथे एका टॅक्सीमध्येही स्फोट झाला होता.

28 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत, मुंबई पोलीस आणि सुरक्षा दलांनी ताज हॉटेल वगळता सर्व ठिकाणे सुरक्षित केली होती. ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांची (NSG) मदत घ्यावी लागली होती. एनएसजीने 29 नोव्हेंबर रोजी 'ऑपरेशन ब्लॅक टॉर्नाडो' सुरू केलं ज्याचा शेवट ताज हॉटेलमधील शेवटच्या उर्वरित हल्लेखोरांना ठार करून झाला आणि मुंबईतील 72 तासांच्या दहशतीचा अंत झाला. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 6 अमेरिकन नागरिकांसह एकूण 166 लोक ठार झाले आणि 300 हून अधिक जखमी झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp