CM Eknath Shinde : लाडक्या बहिणींनो! CM शिंदेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana
CM Eknath Shinde Dussehra Melava Speech
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

point

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

point

एकनाथ शिंदेंनी लाडक्या भावांबाबतही केलं मोठं वक्तव्य

Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana : "दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं, असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आझाद मैदानात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. 

"बाळासाहेबांची विचार घेऊन आम्ही निघालो आहोत. महाराष्ट्रात जिथे जिथे हा एकनाथ शिंदे विचार घेऊन जातो, तिकडे सर्वजण हसतमुखाने स्वागत करतात आणि आशीर्वाद देतात. हेच आपण कमवलं आहे. आपण उठाव का केला, हे मला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांनी सांगितलं होतं, अन्यायावर पेटून उठा. अन्यायाला लात मारा. अन्याय सहन करू नका. जेव्हा अन्याय होऊ लागला तेव्हा आम्ही उठाव केला. हा उठाव केला नसता, तर शिवसेनेचं, शिवसैनिकांचं खच्चीकरण झालं असतं. सच्चा शिवसैनिकांचा अपमान होत राहिला असता आणि महाराष्ट्र अनेक वर्ष मागे गेला असता. ही वस्तूस्थिती आहे, असं मोठं विधान शिंदेंनी केलं.

हे ही वाचा >>  Eknath Shinde: "हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना...", दसरा मेळाव्यात CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

शिंदे पुढे म्हणाले, "आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन आणण्याचं काम आपण केलं. जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं, तेव्हा आपलं राज्य तिसऱ्या नंबरवर होतं. सहा महिन्याच्या आत आपण आपलं राज्य पहिल्या नंबरवर आणलं. परदेशी गुंतवणूकित पहिला नंबर, महिला सक्षमी करणात पहिला नंबर, एक रुपयात पीक विमा देण्यात पहिलं नंबर, कृषी सन्मान योजनेत मोदी साहेबांचे सहा हजार आणि आपले सहा हजार असे बारा हजार देणारं आपलं सरकार आहे. शेतकऱ्यांना वीज मोफत देणारं हे सरकार आहे. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. देशातला सर्वात लांब अटल सेतू करणारं हे पहिलं राज्य आहे."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Aditya Thackeray : ''आणि म्हणून...आणि म्हणून...'', आदित्य ठाकरेंनी केली CM शिंदेंची मिमिक्री

सर्वात मोठं मेट्रोचं जाळं तयार करणारं हे पहिलं राज्य आहे. गेल्या अडीच वर्षात सरकारने घेतलेले निर्णय बघा. आपण कुठे होतो आणि कुठे आलो? हे आपल्या लक्षात येईल. कोविडला घाबरून घरात बसून लपलेला हा मुख्यमंत्री नाही. लोकांच्या मदतीसाठी थेट रस्त्यावर उतरणारा हा मुख्यमंत्री आहे. सत्तांतर झालं नसतं, तर लाखो कोटींचे प्रकल्प थांबले असते. कल्याणकारी योजना थांबल्या असत्या. उद्योग आले नसते आणि माझ्या लाडक्या बहिणींची योजना पण आली नसती. माझ्या लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला नसता. बहिणींना ताबडतोब न्याय मिळाला नसता. शासन आपल्या दारी आलं नसतं. तरुणांना प्रशिक्षण देणारी योजना आली नसती. ज्येष्ठांना वयोश्री योजना आणि तीर्थ दर्शन योजनाही मिळाली नसती. पहिल्या अडीच वर्षात काय झालं आपल्याला माहिती आहे. त्या अडीच वर्षात महाराष्ट्रविरोधी आघाडी या राज्यात सत्तेत होती. दिसेल ते काम बंद पाडण्याचा सपाटा त्यांनी लावला होता, असं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT