Manoj Jarange : 'ठाकरे, पवारांची स्क्रिप्ट जरांगेंच्या...', आरोपावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

जरांगेंच्या या इशाऱ्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सागर बंगला हा सरकारी आहे, कुणीही सरकारी कामानिमित्त कधीही येऊ शकतं', असे उत्तर त्यांनी जरांगेना दिले आहे.
devendra fadnavis reaction on manoj jarange patil maratha reservation sangar bunglow antarwali sarati cm eknath shinde
social share
google news

Devendra Fadnavis Reply Manoj jarange, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 'मी सागर बंगल्यावर येतो, माझा बळी घ्या' असे विधान करून देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्याचा इशारा जरांगेंनी दिला होता. जरांगेंच्या या इशाऱ्यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सागर बंगला हा सरकारी आहे, कुणीही सरकारी कामानिमित्त कधीही येऊ शकतं', असे उत्तर त्यांनी जरांगेना दिले आहे. (devendra fadnavis reaction on manoj jarange patil maratha reservation sangar bunglow antarwali sarati cm eknath shinde) 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथिगृहात बंद दाराआड गुप्त बैठक पार पडली. या बैठकीनंतर महायुती सरकारने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी जरांगेंच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली. 

हे ही वाचा : '...नाहीतर मरून माघारी येणार', गाडी अडवताच जरांगे रडले!

'सागर सरकारी बंगला आहे, कुणीही सरकारी कामानिमित्त कधीही येऊ शकतं', असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच 'ते कुठल्या निराशेतून बोलतायत याबाबत मला कल्पना नाही. पण त्यांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत आणि धादांत खोटं असल्याचे' देवेंद्र फडणवीसांनी म्हणत फेटाळून लावले आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फडणवीस पुढे म्हणाले, 'मराठा समाजासाठी मी काय केलं हे मराठा समाजाला माहिती आहे. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा विद्यार्थ्यांना आणि तरूणांना आशेचे स्थान आहे, त्याची सूरूवात मी केली. त्यातील योजनाची सुरुवात मी केली'. 

मी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही टीकवलं. माझं मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर जे मुख्यमंत्री आले होते, त्यांना आरक्षण टीकवता आले नाही, अशी टीका फडणवीसांनी नाव न घेता ठाकरेंवर केली. तसेच जी स्क्रिप्ट उध्दव ठाकरे बोलतात, शरद पवार बोलतात, नेमका तोच विषय जरांगेंनी का मांडावा असा मला प्रश्न पडलाय,असे देखील फडणवीस म्हणाले आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Video : Rohit sharma ने मैदानातच सरफराझला झापलं,' 'ए भाऊ, हिरो नाही बनायचं इथं''

मला सलाईन मधून विष देऊन मारण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेनी देवेंद्र फडणवीसांवर केला होता. या आरोपावर बोलताना फडणवीस पत्रकारांनाच म्हणाले, अशा गोष्टीला उत्तर द्यायचं का. तसेच कायदा सुव्यवस्था न बिघडता कुणीही आंदोलन केलं तर आमची हरकत नाही, पण कायदा सुव्यवस्थेचे पालन होणार नसेल, तर पोलिसांना योग्य कारवाई करावी लागेल, असा इशारा देखील फडणवीसांनी जरांगे पाटलांना दिला. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT