Nagpur Violence Mastermind: नागपूर हिंसाचार घडवणाऱ्या 'नेत्याला' निवडणुकीत मिळालेली 'एवढी' मतं
Mastermind of Nagpur violence: नागपूर हिंसाचाराचा प्रमुख मास्टरमाईंडला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. हा कोणी सामान्य माणूस नसून एक राजकीय नेता आहे. ज्याने थेट नितीन गडकरींविरोधात निवडणूक लढवली होती.
ADVERTISEMENT

Who is Mastermind of Nagpur violence: नागपूर: नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचा मास्टरमाइंड नेमका कोण हे आता समोर आलं आहे. पोलिसांनी दावा केला आहे की, मुख्य आरोपी, 38 वर्षीय फहीम शमीम खान हाच हिंसाचार भडकवण्यास जबाबदार आहे. शमीम हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) चा नागपूर शहर अध्यक्ष आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत फहीम खान याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. पोलीस तपासात असेही समोर आले की, फहीमने प्रक्षोभक भाषणे देऊन समाजातील लोकांना भडकावले होते, त्यानंतर नागपुरात हिंसाचार उसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, फहीम शमीम खान हा नागपूरच्या संजय बाग कॉलनी यशोधरा नगरचा रहिवासी आहे. त्याचे नाव यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये समोर आले होते. त्याने 2024 ची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) च्या तिकिटावर लढवली होती, ज्यामध्ये त्याला दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर, तो राजकीयदृष्ट्या सक्रिय झाला आणि शहरात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता.
हे ही वाचा>> Nagpur Violence Mastermind: निवडणूक लढवणारा 'हा' नेताच निघाला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, फोटोही आला समोर..
नागपूर हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. फहीम खानने काही कट्टरपंथी लोकांना एकत्र केले आणि नियोजनबद्ध पद्धतीने दंगली घडवण्याचे काम केले. चौकशी अहवालानुसार, हिंसाचाराच्या एक दिवस आधी, एमडीपी नेते गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर जमले होते आणि त्यांनी 'औरंगजेब झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. यावेळी फहीम खानही तिथे उपस्थित होता. जमावाला भडकवण्यात त्यानेच मुख्य भूमिका बजावली असा पोलिसांचा आरोप आहे.
सोमवारी रात्री मध्य नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात हिंसाचार झाला. दंगलखोरांनी पोलिसांवर दगडफेक केली, ज्यामध्ये 34 पोलीस जखमी झाले. एका समुदायाचे धार्मिक पुस्तक जाळल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या, त्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागात संचारबंदी लागू केली.
आतापर्यंत पोलीस कारवाई आणि अटक
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी फहीम खानसह 50 हून अधिक लोकांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल म्हणाले की, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागात अजूनही कर्फ्यू लागू आहे. नागपूरच्या कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपौली, शांत नगर, सक्करदरा, नंदनवन, इमामबारा, यशोधरा नगर आणि कपिल नगर पोलीस स्टेशन परिसरात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> Nagpur Violence : "हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग", FIR मध्ये काय म्हटलंय?"
दंगल नियंत्रण पोलिस (RCP) आणि क्विक रिअॅक्शन टीम (क्यूआरटी) च्या तुकड्या देखील संवेदनशील भागात गस्त घालत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हिंसाचारात ३ डीसीपींसह १२ पोलिस जखमी झाले आहेत.
फहीम खानची राजकीय पार्श्वभूमी आणि वाद
राजकारणात येण्यापूर्वीच फहीम खान वादग्रस्त कारवायांमध्ये सहभागी राहिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्याने त्याच्या समर्थकांची एक कट्टर टीम तयार केली होती. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. नागपूर हिंसाचार भडकवण्याच्या आरोपाबरोबरच, पोलिस त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (NSA) कारवाई करण्याचा विचार करत आहेत. नागपूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, फहीम खानचे कॉल डिटेल्स आणि सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीजची देखील चौकशी केली जात आहे जेणेकरून त्याचे नेटवर्क पूर्णपणे उघड करता येईल.
नागपुरात अजूनही तणाव कायम, कर्फ्यू सुरूच
नागपुरात परिस्थिती नियंत्रणात असूनही, तणाव कायम आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर लक्ष देऊ नका आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. हिंसाचारात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सतत छापे टाकत आहेत. फहीम खानच्या अटकेनंतर हे स्पष्ट झाले आहे की हिंसाचार सुनियोजित पद्धतीने घडवण्यात आला होता. या कटात सहभागी असलेल्या इतर लोकांनाही पकडता यावे म्हणून पोलिस आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत.