Suryakumar Yadav: 'तो कॅच बसला हातात..', सूर्यकुमारने मराठीतून सांगितला 'त्या' कॅचचा नेमका किस्सा!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

सूर्यकुमारने मराठीतून सांगितला कॅचचा किस्सा
सूर्यकुमारने मराठीतून सांगितला कॅचचा किस्सा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूर्यकुमार यादवचं मराठीतून भाषण

point

फायनलमध्ये कसा घेतला कॅच त्याचा नेमका किस्सा

point

विधीमंडळात सूर्यकुमारचा खास सत्कार

Suryakumar Yadav Marathi Speech: मुंबई: टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचं काल (4 जुलै) मुंबईत अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आज (5 जुलै) महाराष्ट्र सरकारच्या वतीने टीम इंडियामधील मुंबईतील खेळाडूंसाठी खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा सोहळा पार पडला. याच सोहळ्यात सूर्यकुमार यादवने टी-20 च्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक कॅच कसा घेतला याबाबत नेमका किस्सा सांगितला. 

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील मुंबईचे इतर खेळाडू यांचा विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने 11 कोटींचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं. याच कार्यक्रमात सूर्यकुमार यादवने मराठीतून भाषण केलं. 

दरम्यान, सूर्यकुमार यादव जेव्हा भाषण करत होता तेव्हा सभागृहातील अनेकांनी त्याला कॅच, कॅच असं ओरडून त्या ऐतिहासिक कॅचची आठवण दिली. तेव्हा सूर्यकुमार म्हणाला की, 'तो कॅच हातात बसला..'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'तो कॅच बसला हातात..', पाहा विधीमंडळात सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला.. 

'जे मी काल पाहिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही. आणि आताही जे मी पाहतोय ते देखील मी कधीच विसरू शकत नाही.' 

'तो कॅच बसला हातात.. धन्यवाद सगळ्यांना.. इकडे येऊन खूप चांगलं वाटलं. आमचे बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार हे आम्हाला घ्यायला आले होते काल तिकडे.' 

'सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जे काल पाहिलं आपल्या मुंबई पोलिसांनी जे केलंय ते मला वाटत नाही असं दुसरं कोणी करू शकतो. आम्हाला असंच प्रोत्साहन मिळत राहील आणि आपण पुन्हा एक वर्ल्ड कप जिंकू..' असं सूर्यकुमार यावेळी म्हणाला. 

ADVERTISEMENT

'बरं झालं बॉल हातात बसला, नाहीतर सूर्याला...', पाहा रोहित काय म्हणाला.. 

दरम्यान, सूर्यकुमारच्या भाषणानंतर रोहित शर्माने देखील मराठीतून भाषण केलं. ज्यामध्ये रोहितने सूर्याने जर कॅच घेतला नसता तर त्याला पुढे मीच बसवलं असतं अशी मिश्किल टिप्पणी केली.

ADVERTISEMENT

'मी फक्त सगळ्यांचा खूप आभारी आहे. हे जे काही घडलं ते माझ्यामुळे, सूर्या किंवा शिवम यांच्यामुळे नाही घडलं तर सगळ्या खेळाडूंमुळे हे घडलं आहे. मी लकी आहे.. कारण जी टीम मला मिळाली त्यातील सगळे खेळाडू हे अगदी जबरदस्त होते. जेव्हा टीमला गरज होती तेव्हा वेगवेगळ्या मॅचमध्ये प्रत्येक खेळाडूने आपली कामगिरी चोख बजावली.' 

'सूर्याने आता सांगितलं की, त्याच्या हातात बॉल बसला.. बरं झालं बॉल हातात बसला.. नाही तर पुढे त्याला मी बसवलं असतं...' असं रोहित शर्मा यावेळी म्हणाला.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT